शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वीच फटाके फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:53 IST

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निसर्गप्रेमींकडून स्वागत

विहार तेंडुलकर 

रत्नागिरी ,11 : दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

दिपावली सण आठवड्यावर आला असताना अजूनही बाजारपेठेत फटाके विक्रीस लावण्यात आलेले नाहीत. दरवर्षी दिवाळी सणापूर्वी आठवडाभर अगोदरपासून फटाके विक्रीला जोर येतो. पण शासनाने ‘फटाकेमुक्त दिपावली’चा नारा दिल्याने सर्वच फटाकेविके्रेते चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात फटाक्यांची खरेदी करून ते विक्रीसाठी मांडत असतो आणि लगीनसराई, दिपावली वा निवडणुका हे फटाक्याच्या विक्रीसाठी हमखास हंगाम मानले जातात. त्यातही दिपावलीच्या काळातच फटाक्यांची प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात उलाढाल करतो.

यंदाही काही दिवसांपूर्वीच व्यापाºयांनी फटाके खरेदी केले आहेत. अजूनही बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नसल्याने व्यापाºयांनी फटाके विक्रीस खुले केले नव्हते. मात्र शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिपावली’ची घोषणा केली आणि या व्यापाºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. दिपावलीसाठी आणलेला लाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत काही व्यापाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात यावर तोडगा निघेल असे वाटत नाही. त्यामुळे एवढ्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. शासनाने अचानक हा निर्णय घेण्यामागे कारण तरी काय? आणि आमच्या होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल या व्यापाºयांनी केला आहे.

दिपावली सण वगळता अन्य काळात फटाक्यांची म्हणावी तेवढ्या प्रमाणात उलाढाल होत नाही. फराळ आणि फटाक्यांची दिपावलीतच मोठी उलाढाल होते. आता फटाक्याच्या विक्रीवरच निर्बंध आल्याने हा सर्व खर्च आमच्याच माथी पडणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.निसर्गप्रेमींकडून स्वागतदरम्यान, शासनाच्या या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. दिपावलीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यावर कुठेतरी निर्बध येणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमींनी व्यक्त केल्या असून शासनाने असा अचानक निर्णय घेणे गैर आहे. वेळीच निर्णय घेतला असता तर व्यापाºयांचे नुकसानही टळले असते, असे या निसर्गप्रेमींनी सांगितले.