शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

दिवाळीपूर्वीच फटाके फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 17:53 IST

दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

ठळक मुद्देलाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निसर्गप्रेमींकडून स्वागत

विहार तेंडुलकर 

रत्नागिरी ,11 : दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’चा नारा दिल्याने फटाके विक्रेत्यांचे फटाके ‘दिपावली’पूूर्वीच फुटले आहेत.

दिपावली सण आठवड्यावर आला असताना अजूनही बाजारपेठेत फटाके विक्रीस लावण्यात आलेले नाहीत. दरवर्षी दिवाळी सणापूर्वी आठवडाभर अगोदरपासून फटाके विक्रीला जोर येतो. पण शासनाने ‘फटाकेमुक्त दिपावली’चा नारा दिल्याने सर्वच फटाकेविके्रेते चिंताग्रस्त आहेत.

दरवर्षी प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात फटाक्यांची खरेदी करून ते विक्रीसाठी मांडत असतो आणि लगीनसराई, दिपावली वा निवडणुका हे फटाक्याच्या विक्रीसाठी हमखास हंगाम मानले जातात. त्यातही दिपावलीच्या काळातच फटाक्यांची प्रत्येक व्यापारी लाखोंच्या घरात उलाढाल करतो.

यंदाही काही दिवसांपूर्वीच व्यापाºयांनी फटाके खरेदी केले आहेत. अजूनही बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नसल्याने व्यापाºयांनी फटाके विक्रीस खुले केले नव्हते. मात्र शासनाने ‘प्रदूषणमुक्त दिपावली’ची घोषणा केली आणि या व्यापाºयांच्या पायाखालची वाळूच सरकली. दिपावलीसाठी आणलेला लाखो रुपयांचा माल तसाच पडून राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

याबाबत काही व्यापाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात यावर तोडगा निघेल असे वाटत नाही. त्यामुळे एवढ्या फटाक्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे. शासनाने अचानक हा निर्णय घेण्यामागे कारण तरी काय? आणि आमच्या होणाºया नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल या व्यापाºयांनी केला आहे.

दिपावली सण वगळता अन्य काळात फटाक्यांची म्हणावी तेवढ्या प्रमाणात उलाढाल होत नाही. फराळ आणि फटाक्यांची दिपावलीतच मोठी उलाढाल होते. आता फटाक्याच्या विक्रीवरच निर्बंध आल्याने हा सर्व खर्च आमच्याच माथी पडणार असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.निसर्गप्रेमींकडून स्वागतदरम्यान, शासनाच्या या निर्णयाचे निसर्गप्रेमींनी स्वागत केले आहे. दिपावलीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यावर कुठेतरी निर्बध येणे गरजेचे होते. त्यामुळे हा निर्णय स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया निसर्गप्रेमींनी व्यक्त केल्या असून शासनाने असा अचानक निर्णय घेणे गैर आहे. वेळीच निर्णय घेतला असता तर व्यापाºयांचे नुकसानही टळले असते, असे या निसर्गप्रेमींनी सांगितले.