शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन ...

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.

सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हागणदारी मुक्त रत्नागिरी जिल्हा करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेची परिभाषा, तांत्रिक पध्दत बदलत चालली आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था तांत्रिक पध्दतीने करणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

स्वच्छतेत रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी यांनी प्रास्ताविक केले. पाणी व स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक अजित माजगांवकर यांनी दहा उपक्रमांची माहिती दिली. श्रध्दा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सरपंच, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.