शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

मार्चअखेर जिल्हा हागणदारीमुक्त करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन ...

रत्नागिरी : स्वच्छता ही कोकणची संस्कृती असून, गावाच्या शेवटच्या घटकापर्यंत पाेहोचून मार्च २०२२पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करुया, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केले.

सरपंच स्वच्छता संवाद या उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हागणदारी मुक्त रत्नागिरी जिल्हा करणार असल्याचे सांगितले. स्वच्छतेची परिभाषा, तांत्रिक पध्दत बदलत चालली आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था तांत्रिक पध्दतीने करणे गरजेचे आहे. यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.

स्वच्छतेत रत्नागिरीचा इतिहास आहे. देशामध्ये स्वच्छतेत रत्नागिरी जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. परवडी यांनी प्रास्ताविक केले. पाणी व स्वच्छता विभागाचे व्यवस्थापक अजित माजगांवकर यांनी दहा उपक्रमांची माहिती दिली. श्रध्दा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सर्व सरपंच, जिल्हा परिषद सभापती, पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.