शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पाचवी ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने दि. ४ ऑक्टोपासून शाळा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पाचवी ते बारावीपर्यंतच्या जिल्हा परिषद व खासगी शाळा मिळून जिल्ह्यातील ३,१३१ शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील ७६.५८ टक्के विद्यार्थ्यांचे कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू होते. मात्र, आता पहिली ते चौथीचे वर्ग वगळता पाचवीपासून बारावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अध्यापन सुरू होणार आहे.

कोरोनामुळे गतवर्षीही ऑनलाइन अध्यापन सुरू होते. दिवाळी सुट्टीनंतर सुरुवातीला नववी ते बारावी व जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र, वार्षिक परीक्षेपूर्वीच कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने परीक्षाच रद्द करण्यात आल्या व सरसकट मुलांना पास करण्यात आले. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतु, कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली. कोरोनामुक्त असलेल्या गावातून शाळा सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील अवघ्या ६० शाळांचे अध्यापन सुरू झाले होते.

गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेऊन शासनाने शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शाळांमध्ये खेळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शाळेत उपस्थितीची अट ठेवण्यात आलेली नाही, शिवाय वर्ग सुरू करताना पालकांची संमत्ती घेणे आवश्यक असल्याचे सूचित केले आहे. तसेच शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ३,१५१ शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतच्या एक लाख ६२ हजार ६१६ विद्यार्थ्यांचे ऑफलाइन अध्यापन सुरू होणार आहे.

—————————-

शासनाने दि. ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच प्राप्त होईल. शासनाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार असून, याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. नवीन परिपत्रक प्राप्त होताच शाळांना पाठविण्यात येणार असून, पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी

————————

एकूण शाळा ३१५१

पाचवी ते आठवीचे एकूण विद्यार्थी १,६२, ६१६

—————————

विद्यार्थी संख्या

इयत्ता मुलगे मुली एकूण विद्यार्थी

पाचवी १०२३३ ९५०३ १९७३६

सहावी १०५२७ ९८२२ २०३४९

सातवी १०३६७ ९८६३ २०२३०

आठवी १०८७७ ९८८४ २०७५४

नववी ११३८५ १०८१९ २२२०४

दहावी ११२३७ १०६९३ २१९३०

अकरावी ९७७४ ९६६८ १९४४२

बारावी ८९३२ ८८३९ १७७७१