शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

चिकुनगुनिया, कावीळ यांच्या साथींपासून जिल्हा लांबच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST

रहिम दलाल लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याची साथरोगांचा प्रादुर्भाव या वर्षभरात झालेला नाही. जिल्ह्यात चिकुनगुनियाचा ...

रहिम दलाल

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाव्यतिरिक्त इतर कोणत्याची साथरोगांचा प्रादुर्भाव या वर्षभरात झालेला नाही. जिल्ह्यात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. काविळीचे अवघे २ रुग्ण तर डेंग्यूचे १९ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. जिल्ह्यात चिकुनगुनिया, कावीळ आणि डेंग्यूची साथ जिल्ह्यात पसरलेली नाही.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र साथींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो. मात्र, रत्नागिरी जिल्हा साथींचा आजारापासून नेहमीच दूर राहिलेला आहे. चिपळूण, खेडमध्ये आलेल्या महापुरानंतर आरोग्य यंत्रणेला रोगराईला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आरोग्य यंत्रणेने या भागात दिवसरात्र काम करून कोणतीही साथ पसरणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान, खेड शहरामध्ये गेल्याच आठवड्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाने ही साथ पसरू दिलेली नाही.

वर्षभरात चिकुनगुनियाचे रुग्ण शून्य

कोरोना विषाणूप्रमाणेच चिकुनगुनियाही एक आजार असून, एका विषाणूपासून याचा संसर्ग होतो. गेल्या काही वर्षांपासून बर्ड फ्लू, डेंग्यू अशा रोगांच्या पंगतीतच चिकुनगुनिया येऊन बसला आहे. एडीस जातीच्या डासाच्या माध्यमातून पसरणारा चिकुनगुनिया हा रोग एका विशिष्ट विषाणूंपासून होतो. वर्षभरात चिकुनगुनियाचा एकही रुग्ण नाही.

वेळोवेळी जनजागृती

n जिल्ह्यात कावीळ आणि चिकुनगुनियाची वर्षभरात साथच पसरलेली नाही. काविळीचे रुग्णही अत्यल्प आहेत.

n डेंग्यूचे रुग्णही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नाहीत. याबाबत आरोग्य विभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येते.

जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्हा रोगराईपासून दूर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादा आजार झाल्यास रुग्णांवर वेळीच उपचार केले जातात. चिकुनगुनियाचा जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेेला नाही.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये,

जिल्हा आरोग्य अधिकारी, रत्नागिरी

डेंग्यू - अचानक उच्च ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अतिथकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे ही लक्षणे आहेत. अशक्तपणा आणि भूक कमी होऊन ती अनेक आठवडे राहते.

कावीळ - अशक्तपणा, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलट्या होणे, झोप लागणे, डोळेही पिवळे होतात.

चिकुनगुनिया - हाताच्या आणि पायाच्या सांध्यांमध्ये जास्त वेदना आणि सूज येते. ताप येणे. मनगट, कोपरामध्येही समस्या निर्माण होते.