शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:33 IST

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ...

ठळक मुद्देयेत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी झाडगांव, मुरूगवाडा, १५ माड कोंड ते भाटिमिºया, जाकिमिºया येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

गेली ४० वर्षे या भागातील समुद्र किनाºयांची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भगवतीबंदर येथील ब्रेक वॉटर वॉल अपूर्ण अवस्थेत आहे. ही वॉल १९६७ साली बांधण्यास सुरूवात झाली तेव्हापासून मिºया किनाºयाची धूप होण्यास १९७२, ७३ सालापासून सुरूवात झाली. तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून  मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ बांधताना समुद्रात दगडी भिंत बांधण्यात आली आहे.

या कारणांमुळे आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मानवी वस्तीत पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण होतो. तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोणतीच भरपाई नागरिकांना मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघालेला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टप्पा क्रमांक २ मुळे या गावांमध्ये समुद्राचे अतिक्रमण होत आहे. यासाठी दगडाचा बंधारा बंद करून टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा व्हावा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच हे काम होईपर्यंत टप्पा क्र. २चे दगडी बंधारा बांधण्याचे काम थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या आंदोलनात आप्पा वांदरकर, राकेश नागवेकर, चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तन्मया शिवलकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, प्रमोद नार्वेकर, रूपेश सनगरे, राजेंद्र बनप, ययाती शिवलकर, मीरा पिलणकर, अ‍ॅड. संजय पोकडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप