शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
4
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
5
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
6
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
7
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
8
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
9
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
10
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
11
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
12
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
13
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
14
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
15
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
16
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
17
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
18
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
19
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
20
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
Daily Top 2Weekly Top 5

धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:33 IST

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ...

ठळक मुद्देयेत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी झाडगांव, मुरूगवाडा, १५ माड कोंड ते भाटिमिºया, जाकिमिºया येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

गेली ४० वर्षे या भागातील समुद्र किनाºयांची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भगवतीबंदर येथील ब्रेक वॉटर वॉल अपूर्ण अवस्थेत आहे. ही वॉल १९६७ साली बांधण्यास सुरूवात झाली तेव्हापासून मिºया किनाºयाची धूप होण्यास १९७२, ७३ सालापासून सुरूवात झाली. तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून  मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ बांधताना समुद्रात दगडी भिंत बांधण्यात आली आहे.

या कारणांमुळे आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मानवी वस्तीत पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण होतो. तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोणतीच भरपाई नागरिकांना मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघालेला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टप्पा क्रमांक २ मुळे या गावांमध्ये समुद्राचे अतिक्रमण होत आहे. यासाठी दगडाचा बंधारा बंद करून टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा व्हावा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच हे काम होईपर्यंत टप्पा क्र. २चे दगडी बंधारा बांधण्याचे काम थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या आंदोलनात आप्पा वांदरकर, राकेश नागवेकर, चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तन्मया शिवलकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, प्रमोद नार्वेकर, रूपेश सनगरे, राजेंद्र बनप, ययाती शिवलकर, मीरा पिलणकर, अ‍ॅड. संजय पोकडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप