शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

धूप प्रतिबंधक बंधाºयासाठी ग्रामस्थ आक्रमक -निधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:33 IST

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी ...

ठळक मुद्देयेत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेल्या मुरूडवाडा येथील कायमस्वरूपी धूप बंधाºयासाठी या परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून गुरूवारी झाडगांव, मुरूगवाडा, १५ माड कोंड ते भाटिमिºया, जाकिमिºया येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

गेली ४० वर्षे या भागातील समुद्र किनाºयांची मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. भगवतीबंदर येथील ब्रेक वॉटर वॉल अपूर्ण अवस्थेत आहे. ही वॉल १९६७ साली बांधण्यास सुरूवात झाली तेव्हापासून मिºया किनाºयाची धूप होण्यास १९७२, ७३ सालापासून सुरूवात झाली. तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून  मिरकरवाडा टप्पा क्रमांक २ बांधताना समुद्रात दगडी भिंत बांधण्यात आली आहे.

या कारणांमुळे आजतागायत प्रत्येक पावसाळ्यात धूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे मानवी वस्तीत पाणी येत असल्याने या परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण होतो. तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानाबाबत कोणतीच भरपाई नागरिकांना मिळालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही यावर कोणताच तोडगा निघालेला नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टप्पा क्रमांक २ मुळे या गावांमध्ये समुद्राचे अतिक्रमण होत आहे. यासाठी दगडाचा बंधारा बंद करून टेट्रापॉड टाकून कायमस्वरूपी बंधारा व्हावा. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा तसेच हे काम होईपर्यंत टप्पा क्र. २चे दगडी बंधारा बांधण्याचे काम थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत या कामास सुरूवात करावी. अधिवेशनापुर्वी हे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण होऊन शासनाविरोधात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

या आंदोलनात आप्पा वांदरकर, राकेश नागवेकर, चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्य तन्मया शिवलकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, प्रमोद नार्वेकर, रूपेश सनगरे, राजेंद्र बनप, ययाती शिवलकर, मीरा पिलणकर, अ‍ॅड. संजय पोकडे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीStrikeसंप