शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:55 IST

अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.

ठळक मुद्देअल्पबचतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विभाग होणार कायमस्वरूपी बंद

रत्नागिरी : अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.शासनाने ३ जानेवारी १९५७ साली अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली होती. मात्र, २००५पासून महाराष्ट्र शासनाने केंद्रीय कर्ज सहाय्य घेण्यात येऊ नये, असे धोरण अंगिकारले आहे. तसेच नवीन अभिकर्त्यांची नेमणूक, प्रोत्साहनपर अनुदान व योजनांची प्रसिद्धी करणे बंद केले. अल्पबचत संचालनालय व त्याच्या अधिनस्त असलेली विभागीय अल्पबचत कार्यालये व जिल्हा अल्पबचत कार्यालये यामधील पदेही कमी करण्यात आली.१ नोव्हेंबर २०१७पासून अल्पबचत संचालनालयाचे कामकाज पूर्णत: बंद झाल्याने हे संचालनालय कायमस्वरूपी बंद करण्यात आले. २६ आॅक्टोबर २०१७च्या शासन निर्णयानुसार अल्पबचत संचालनालयाकडील अल्पबचत अभिकर्त्यांचे परवाने नूतनीकरणाचे, रद्द करण्याचे कामकाज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात आले होते.मात्र, या निर्णयातही आता बदल करण्यात आला असून, ३ मे रोजी शासनाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार आता अल्पबचत, महिलाप्रधान अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज महसूल विभागाच्या आस्थापनेवरील जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात यावे, असा बदल करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे काम दोन वर्षापूर्वीच बंद करण्यात आले होते. अभिकर्त्यांच्या परवाना नूतनीकरण आणि रद्द करणे एवढ्याच बाबी जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. आता सर्व कामकाज जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे.अल्पबचत विभाग बंद झाल्याने इमारत रिकामीरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अल्पबचत विभागाची इमारत असून, यात या विभागाचे कामकाज सुरू होते. मात्र, दोन वर्षापूर्वी अल्पबचत विभाग बंद झाल्याने ही इमारत रिकामी झाली आहे. या इमारतीच्या सभागृहाचा उपयोग मात्र विविध कार्यक्रमांसाठी होत आहे.

टॅग्स :Alpa Bachat Bhawanअल्प बचत भवनRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी