शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:55 IST

अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.

ठळक मुद्देअल्पबचतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने विभाग होणार कायमस्वरूपी बंद

रत्नागिरी : अल्पबचत संचालनालय बंद करण्यात आल्याने अल्पबचत अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज आता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दोन वर्षापूर्वीच या विभागातील अनेक महत्त्वाची पदे कमी करण्यात आली होती. आता खऱ्या अर्थाने हा विभाग कायमस्वरूपी बंद होणार आहे.शासनाने ३ जानेवारी १९५७ साली अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली होती. मात्र, २००५पासून महाराष्ट्र शासनाने केंद्रीय कर्ज सहाय्य घेण्यात येऊ नये, असे धोरण अंगिकारले आहे. तसेच नवीन अभिकर्त्यांची नेमणूक, प्रोत्साहनपर अनुदान व योजनांची प्रसिद्धी करणे बंद केले. अल्पबचत संचालनालय व त्याच्या अधिनस्त असलेली विभागीय अल्पबचत कार्यालये व जिल्हा अल्पबचत कार्यालये यामधील पदेही कमी करण्यात आली.१ नोव्हेंबर २०१७पासून अल्पबचत संचालनालयाचे कामकाज पूर्णत: बंद झाल्याने हे संचालनालय कायमस्वरूपी बंद करण्यात आले. २६ आॅक्टोबर २०१७च्या शासन निर्णयानुसार अल्पबचत संचालनालयाकडील अल्पबचत अभिकर्त्यांचे परवाने नूतनीकरणाचे, रद्द करण्याचे कामकाज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात आले होते.मात्र, या निर्णयातही आता बदल करण्यात आला असून, ३ मे रोजी शासनाने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रकानुसार आता अल्पबचत, महिलाप्रधान अभिकर्त्यांच्या परवान्याबाबतचे सर्व कामकाज महसूल विभागाच्या आस्थापनेवरील जिल्हाधिकाऱ्यांकडे कायमस्वरूपी हस्तांतरीत करण्यात यावे, असा बदल करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील अल्पबचत विभागाचे काम दोन वर्षापूर्वीच बंद करण्यात आले होते. अभिकर्त्यांच्या परवाना नूतनीकरण आणि रद्द करणे एवढ्याच बाबी जिल्हाधिकारी यांच्या कक्षेत ठेवण्यात आल्या होत्या. आता सर्व कामकाज जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली होणार आहे.अल्पबचत विभाग बंद झाल्याने इमारत रिकामीरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अल्पबचत विभागाची इमारत असून, यात या विभागाचे कामकाज सुरू होते. मात्र, दोन वर्षापूर्वी अल्पबचत विभाग बंद झाल्याने ही इमारत रिकामी झाली आहे. या इमारतीच्या सभागृहाचा उपयोग मात्र विविध कार्यक्रमांसाठी होत आहे.

टॅग्स :Alpa Bachat Bhawanअल्प बचत भवनRatnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारी