शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

जिल्हाधिकारी म्हणतात, बालपणीची दिवाळी मनसोक्त आनंद देणारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:53 IST

diwali, collacator, ratnagirinews बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सांगतात दिवाळीच्या आठवणी बालपणीची दिवाळी मनसोक्त आनंद देणारी

शोभना कांबळेरत्नागिरी : बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचेजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.लहानपणीच्या दिवाळी सणाच्या आठवणी जागवताना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिवाळीच्या दिवसातील आनंद पुरेपूर घेत असल्याचे सांगितले. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे लागे. परंतु नवीन कपडे, फराळ आणि फटाके याच्या आकर्षणाने आपोआपच जाग येत असे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर विविध प्रकारची मिठाई खाण्यात खूप मजा येत असे.

महाराष्ष्ट्रात दिवाळीत लाडू, करंज्या या जशा प्रसिद्ध आहेत, तशा आमच्याकडे गुजिया हा पारंपरिक पदार्थ तसेच ह्यनारळाचे लाडूह्ण प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय रसगुल्ला आणि इतर मिठाईही बनवली जाते. हे पदार्थ एकमेकांच्या घरी नेऊन देण्यात फार आनंद वाटे. घरी भरपूर फटाके आणले जात. सगळी मुले एकत्र येत दिवसभर भरपूर फटाके फोडण्याचा आनंद घेत असत.

ओरिसात दिवाळीत कालिपूजा केली जाते. या दिवशी कालीमातेच्या मंदिरात जाऊन पूजाअर्चा होते. महाराष्ट्रातील लक्ष्मीपूजनासाररखी ही पूजा असते. अतिशय भक्तीभावाने ही पूजा आम्ही करत असू. रात्री दिव्यांची सजावट प्रत्येक घरात असे. लहानपणी आम्ही हा सण कधी येतो, याची वाट पाहात असू. आता मोठेपणी हा आनंद दुर्मीळ झाला आहे, अशी खंत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व्यक्त करतात.आता तो आनंद दुर्मीळमोठेपणी कामाचा व्याप वाढतो. त्यामुळे लहानपणीच्या सणांचा आनंद घेता येत नाही. प्रशासनात काम करताना अनेक कर्तव्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचदा आपल्याला दिवाळीसारख्या सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, लहानपणी मनमुराद घेतलेल्या दिवाळीच्या आठवणी अजूनही आनंद देतात, अशा भावना जिल्हाधिकारी मिश्रा व्यक्त करतात.खबरदारी घ्या...दिवाळी हा सण दिव्यांचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा हा उत्सव. घरोघरी सुख, शांती आणि समृद्धी यावी, यासाठी या सणाकडे मागणी केली जाते. सध्या कोरोनाचे संकट सर्वत्रच आहे. त्यामुळे जनतेने शासन नियमांचे पालन करून आणि योग्य खबरदारी घेत हा सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी