शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी म्हणतात, बालपणीची दिवाळी मनसोक्त आनंद देणारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:53 IST

diwali, collacator, ratnagirinews बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सांगतात दिवाळीच्या आठवणी बालपणीची दिवाळी मनसोक्त आनंद देणारी

शोभना कांबळेरत्नागिरी : बालपणी आम्ही खूप फटाके फोडायचो. दिवाळीची विविध मिठाई, पंचपक्वान्ने आणि फटाक्यांची आतषबाजी ही लहानपणी आमच्या दृ�टीने आनंददायी असायची. दिवाळीच्या दिवसात सगळ्यात आनंदाचे वातावरण मुलांमध्ये असायचे. बालपणीचा दिवाळीचा आनंद निर्मळ असायचा, अशा शब्दात रत्नागिरीचेजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा बालपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगतात.लहानपणीच्या दिवाळी सणाच्या आठवणी जागवताना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिवाळीच्या दिवसातील आनंद पुरेपूर घेत असल्याचे सांगितले. दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे लागे. परंतु नवीन कपडे, फराळ आणि फटाके याच्या आकर्षणाने आपोआपच जाग येत असे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर विविध प्रकारची मिठाई खाण्यात खूप मजा येत असे.

महाराष्ष्ट्रात दिवाळीत लाडू, करंज्या या जशा प्रसिद्ध आहेत, तशा आमच्याकडे गुजिया हा पारंपरिक पदार्थ तसेच ह्यनारळाचे लाडूह्ण प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय रसगुल्ला आणि इतर मिठाईही बनवली जाते. हे पदार्थ एकमेकांच्या घरी नेऊन देण्यात फार आनंद वाटे. घरी भरपूर फटाके आणले जात. सगळी मुले एकत्र येत दिवसभर भरपूर फटाके फोडण्याचा आनंद घेत असत.

ओरिसात दिवाळीत कालिपूजा केली जाते. या दिवशी कालीमातेच्या मंदिरात जाऊन पूजाअर्चा होते. महाराष्ट्रातील लक्ष्मीपूजनासाररखी ही पूजा असते. अतिशय भक्तीभावाने ही पूजा आम्ही करत असू. रात्री दिव्यांची सजावट प्रत्येक घरात असे. लहानपणी आम्ही हा सण कधी येतो, याची वाट पाहात असू. आता मोठेपणी हा आनंद दुर्मीळ झाला आहे, अशी खंत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व्यक्त करतात.आता तो आनंद दुर्मीळमोठेपणी कामाचा व्याप वाढतो. त्यामुळे लहानपणीच्या सणांचा आनंद घेता येत नाही. प्रशासनात काम करताना अनेक कर्तव्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बरेचदा आपल्याला दिवाळीसारख्या सणांचा आनंद घेता येत नाही. मात्र, लहानपणी मनमुराद घेतलेल्या दिवाळीच्या आठवणी अजूनही आनंद देतात, अशा भावना जिल्हाधिकारी मिश्रा व्यक्त करतात.खबरदारी घ्या...दिवाळी हा सण दिव्यांचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असा हा उत्सव. घरोघरी सुख, शांती आणि समृद्धी यावी, यासाठी या सणाकडे मागणी केली जाते. सध्या कोरोनाचे संकट सर्वत्रच आहे. त्यामुळे जनतेने शासन नियमांचे पालन करून आणि योग्य खबरदारी घेत हा सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी