शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जिल्ह्यात कोसळधार

By admin | Updated: September 18, 2015 23:22 IST

जिल्ह्यात कोसळधार

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने काल (दि. १८) सिंहस्थ पर्वणीच्या अखेरच्या तिसऱ्या शाहीस्नानाच्या आणि ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासूनच जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणांत पाणीसाठा वाढल्याचे चित्र होते.काल सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात सरासरी ४७ (७१०.९) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक- ४६.३, इगतपुरी-५७, दिंडोरी-४५, पेठ-१२.२, त्र्यंबकेश्वर- २६, मालेगाव-९६, नांदगाव-५२, चांदवड-२८.६, कळवण-७७.७, बागलाण-२०, सुरगाणा- २४.४, देवळा- ४६७.२, निफाड- ५६.४, सिन्नर-८८, येवला-३८९ असा एकुण- ७१०. ९ (सरासरी ४७ टक्के ) नोंदविण्यात आला. या पावसामुळे रब्बी हंगामाला फायदा होणार असून, जिल्ह्यातील अत्यल्प असलेल्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ होणार आहे. काल पहाटे ३ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दुपारी ३ पर्यंत कायम होता. तीन वाजेनंतर जोर थोडा कमी झाला तरी पावसाची संततधार मात्र कायम होती. या कालच्या पावसामुळे पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा फायदा होणार असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)इन्फो..जोर दोन दिवसकाल पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर दिवसभर कायम होता. हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाचा असाच जोर शनिवारी (दि.१९) व रविवारी (२०) कायम राहणार असल्याचे भाकित वर्तविले आहे. पावसाचा जोर असाच तीन दिवस कायम राहिल्यास जिल्ह्णातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. खरिपासाठी या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्यास त्यामुळे खूप मदत होणार आहे.