शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

रत्नागिरीत २४ पासून जिल्हा कृषी महोत्सव, पशु-पक्षी प्रदर्शन, १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:19 IST

महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २८ फेब्रुवारीअखेर प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे- शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे आदी उद्देशाने आयोजन.तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मानप्रदर्शनाच्या निमित्ताने एकूण २०० स्टॉल्स - आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन.

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ ते २८ फेब्रुवारीअखेर प्रमोद महाजन क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे जिल्हा कृषी महोत्सव व पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.शेतकºयांना शासनाच्या विविध योजना, उपक्रमांची माहिती देणे, संशोधन कृषी तंत्रज्ञान व प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, धान्य व खाद्य महोत्सवाद्वारे थेट विक्रीला चालना देणे, यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यात दरवर्षी पाच दिवसांचा जिल्हा कृषी महोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी प्रतिजिल्हा १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.आंबा आणि काजू प्रक्रियेचे स्वतंत्र दालन प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. खते, कीटकनाशके व बियाणी यांचे दालन उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, धान्य महोत्सव बचत गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन, शेतकरी यंत्र व अवजारे दालन, विविध जातींच्या पशु-पक्ष्यांचे प्रदर्शन यांसारखे एकूण २०० स्टॉल प्रदर्शनाच्या निमित्ताने मांडण्यात येणार आहेत.

प्रदर्शनाचे औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येकी दोन मिळून एकूण १८ शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कृषीविषयक परिसंवाद व चर्चासत्र तसेच विक्रेता व खरेदीदार संमेलन भरविण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे कार्यरत असणाºया एक्झॉटिक कंपनीचे दालन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

फळप्रक्रिया करणारी ही कंपनी असून, प्रक्रियेसाठी लागणारा ८० टक्के आंबा परराज्यातून विकत घेते. यावर्षीपासून जिल्ह्यातील आंबा विक्रीला घेण्याची सूचना कंपनीला केली जाणार आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव देण्यात यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्रात बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. कर्नाटक व अन्य राज्यात याचा प्रसार झाला आहे, अशी माहिती पशु विभागातर्फे देण्यात आली. यावेळी विभागीय कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा उपविभागीय कृषी अधीक्षक एस. एस. जगताप उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेती