शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

जिल्ह्यात ५१ शाळा निर्लेखन प्रतीक्षेत

By admin | Updated: August 22, 2014 01:07 IST

जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ५१ प्राथमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व शाळा निर्लेखनाच्या प्रतीक्षेत आहेत.शासनाकडून शैक्षणिक प्रगतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, पडझड झालेल्या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळा इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे वेळीच निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आजही धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींचे निर्लेखन करुन ठेवण्यात येते. धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींच्या जागी नवीन शाळांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. मोडकळीस आलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारती पाडून त्या जागी नवीन शाळा बांधणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे धोकादायक स्थितीत असलेल्या प्राथमिक शाळांचे ५१ प्रस्ताव आले होते. या शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांचे निर्लेखन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील १६ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी मंजूर करण्यात आले आहेत, तर ८ शाळांचे प्रस्ताव उपअभियंत्यांकडे प्रलंबित आहेत. शिवाय १३ प्राथमिक शाळांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. १४ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच या शाळांचे निर्लेखन करणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याची ओरड जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे या शाळांचे निर्लेखन कधी होणार? हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)