शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

जिल्ह्यात ५१ शाळा निर्लेखन प्रतीक्षेत

By admin | Updated: August 22, 2014 01:07 IST

जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ५१ प्राथमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व शाळा निर्लेखनाच्या प्रतीक्षेत आहेत.शासनाकडून शैक्षणिक प्रगतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, पडझड झालेल्या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळा इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे वेळीच निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आजही धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींचे निर्लेखन करुन ठेवण्यात येते. धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींच्या जागी नवीन शाळांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. मोडकळीस आलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारती पाडून त्या जागी नवीन शाळा बांधणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे धोकादायक स्थितीत असलेल्या प्राथमिक शाळांचे ५१ प्रस्ताव आले होते. या शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांचे निर्लेखन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील १६ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी मंजूर करण्यात आले आहेत, तर ८ शाळांचे प्रस्ताव उपअभियंत्यांकडे प्रलंबित आहेत. शिवाय १३ प्राथमिक शाळांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत. १४ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच या शाळांचे निर्लेखन करणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याची ओरड जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे या शाळांचे निर्लेखन कधी होणार? हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)