शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

जिल्ह्यातील १९ आरोग्यसेवकांच्या नोकरीवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य ...

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविकांची सेवा संपुष्टात आणली आहे. जिल्ह्यातील १०२ पैकी ८२ पदे मंजूर केल्याने १९ आरोग्यसेविकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. १५ वर्षे योगदान देऊनही या सेविकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ६०० परिचारिकांची सेवा ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविका कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या एका पत्रामुळे ६०० परिचारिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे येथील आरोग्यसेविकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी आरोग्यसेविकांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून या आरोग्यसेविका आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहेत. आरोग्य विभागाने केंद्र शासनाला ३२०७ आरोग्यसेविकेची पदे मंजुरीकरिता प्रस्तावित केली होती. त्यांपैकी ५९७ पदांना मंजुरी मिळाली नाही, हे कारण दाखवून ५९७ आरोग्यसेविका यांच्या सेवासमाप्तीचा आदेश दिले आहेत.

ज्या उपकेंद्रांची प्रसूतिसंख्या मागील वर्षभराच्या काळात शून्य आहे. तेथील आरोग्यसेविकेची सेवा समाप्त करावी; परंतु, हा निकष अन्यायकारक आहे. कारण मागील तीन वर्षांपासूनच विभागाने उपकेंद्रावर प्रसूती करू नये, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले. आमदार शेखर निकम यांना निवेदन देताना स्वप्नाली ठसाळे, योगेश कांबळी, माधवी ठसाळे उपस्थित होत्या.

----------------------------

गेली दोन वर्षे कंत्राटी आरोग्यसेविकांना प्रधान सचिवांनी केवळ कोविडचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सन २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यातील कमीत कमी लोकसंख्येची पदे रद्द करण्याचा निकष लावला आहे; परंतु, या लोकसंख्येच्या उपकेंद्रास आरोग्यसेविका भरण्यास मंजुरी विभागानेच दिलेली होती.

-----------------------

गेल्या पंधरा वर्षांपासून शहराचा ग्रामीण भागात अविरतपणे आरोग्य सेवा देत होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना कालावधीत तर त्यांनी रात्रंदिवस काम केले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ऐन उमेदीच्या कालावधीत करायचे काय, त्यांच्या जिवावर कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. मात्र, सेवासमाप्तीच्या आदेशामुळे या सेविका, सेवक पुरते भांबावून गेले आहेत.

- स्वप्नाली ठसाळे, आरोग्यसेविका