शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १९ आरोग्यसेवकांच्या नोकरीवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य ...

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविकांची सेवा संपुष्टात आणली आहे. जिल्ह्यातील १०२ पैकी ८२ पदे मंजूर केल्याने १९ आरोग्यसेविकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. १५ वर्षे योगदान देऊनही या सेविकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ६०० परिचारिकांची सेवा ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविका कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या एका पत्रामुळे ६०० परिचारिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे येथील आरोग्यसेविकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी आरोग्यसेविकांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून या आरोग्यसेविका आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहेत. आरोग्य विभागाने केंद्र शासनाला ३२०७ आरोग्यसेविकेची पदे मंजुरीकरिता प्रस्तावित केली होती. त्यांपैकी ५९७ पदांना मंजुरी मिळाली नाही, हे कारण दाखवून ५९७ आरोग्यसेविका यांच्या सेवासमाप्तीचा आदेश दिले आहेत.

ज्या उपकेंद्रांची प्रसूतिसंख्या मागील वर्षभराच्या काळात शून्य आहे. तेथील आरोग्यसेविकेची सेवा समाप्त करावी; परंतु, हा निकष अन्यायकारक आहे. कारण मागील तीन वर्षांपासूनच विभागाने उपकेंद्रावर प्रसूती करू नये, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले. आमदार शेखर निकम यांना निवेदन देताना स्वप्नाली ठसाळे, योगेश कांबळी, माधवी ठसाळे उपस्थित होत्या.

----------------------------

गेली दोन वर्षे कंत्राटी आरोग्यसेविकांना प्रधान सचिवांनी केवळ कोविडचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सन २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यातील कमीत कमी लोकसंख्येची पदे रद्द करण्याचा निकष लावला आहे; परंतु, या लोकसंख्येच्या उपकेंद्रास आरोग्यसेविका भरण्यास मंजुरी विभागानेच दिलेली होती.

-----------------------

गेल्या पंधरा वर्षांपासून शहराचा ग्रामीण भागात अविरतपणे आरोग्य सेवा देत होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना कालावधीत तर त्यांनी रात्रंदिवस काम केले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ऐन उमेदीच्या कालावधीत करायचे काय, त्यांच्या जिवावर कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. मात्र, सेवासमाप्तीच्या आदेशामुळे या सेविका, सेवक पुरते भांबावून गेले आहेत.

- स्वप्नाली ठसाळे, आरोग्यसेविका