शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जिल्ह्यातील १९ आरोग्यसेवकांच्या नोकरीवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य ...

चिपळूण : गेली १५ वर्षे शहरासह ग्रामीण भागात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्यसेविकांची सेवा संपुष्टात आणली आहे. जिल्ह्यातील १०२ पैकी ८२ पदे मंजूर केल्याने १९ आरोग्यसेविकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे. १५ वर्षे योगदान देऊनही या सेविकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तब्बल ६०० परिचारिकांची सेवा ३१ ऑगस्टपासून थांबविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्याच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १९ कंत्राटी आरोग्यसेविका कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या एका पत्रामुळे ६०० परिचारिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. यामुळे येथील आरोग्यसेविकांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी आरोग्यसेविकांनी सांगितले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या १५ वर्षांपासून या आरोग्यसेविका आरोग्य विभागात अविरत सेवा देत आहेत. आरोग्य विभागाने केंद्र शासनाला ३२०७ आरोग्यसेविकेची पदे मंजुरीकरिता प्रस्तावित केली होती. त्यांपैकी ५९७ पदांना मंजुरी मिळाली नाही, हे कारण दाखवून ५९७ आरोग्यसेविका यांच्या सेवासमाप्तीचा आदेश दिले आहेत.

ज्या उपकेंद्रांची प्रसूतिसंख्या मागील वर्षभराच्या काळात शून्य आहे. तेथील आरोग्यसेविकेची सेवा समाप्त करावी; परंतु, हा निकष अन्यायकारक आहे. कारण मागील तीन वर्षांपासूनच विभागाने उपकेंद्रावर प्रसूती करू नये, अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले. आमदार शेखर निकम यांना निवेदन देताना स्वप्नाली ठसाळे, योगेश कांबळी, माधवी ठसाळे उपस्थित होत्या.

----------------------------

गेली दोन वर्षे कंत्राटी आरोग्यसेविकांना प्रधान सचिवांनी केवळ कोविडचे कामकाज करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सन २०११ च्या जनगणनेनुसार यादी तयार करून त्यातील कमीत कमी लोकसंख्येची पदे रद्द करण्याचा निकष लावला आहे; परंतु, या लोकसंख्येच्या उपकेंद्रास आरोग्यसेविका भरण्यास मंजुरी विभागानेच दिलेली होती.

-----------------------

गेल्या पंधरा वर्षांपासून शहराचा ग्रामीण भागात अविरतपणे आरोग्य सेवा देत होत्या. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना कालावधीत तर त्यांनी रात्रंदिवस काम केले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. ऐन उमेदीच्या कालावधीत करायचे काय, त्यांच्या जिवावर कुटुंबाची रोजीरोटी सुरू आहे. मात्र, सेवासमाप्तीच्या आदेशामुळे या सेविका, सेवक पुरते भांबावून गेले आहेत.

- स्वप्नाली ठसाळे, आरोग्यसेविका