शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

दवाखाने की कसाईखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

एखाद्या घरात कोरोनाबाधित असला तर दुर्दैवाने शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णांचे नातेवाईक हबकून जातात आणि ...

एखाद्या घरात कोरोनाबाधित असला तर दुर्दैवाने शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णांचे नातेवाईक हबकून जातात आणि मग त्याला वाचविण्यासाठी जीवाचे रान करून चांगल्यात चांगल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी धडपड करतात. महागडे असले तरीही आपल्या माणसाचा जीव त्यापेक्षाही लाखमोलाचा आहे, असा विचार करून पैशाची जमवाजमव करतात. काही खासगी रुग्णालये तर आधी पैसे ओता आणि मग रुग्णाला आत आणा, अशी असंवेदनशीलता दाखवतात. रुग्ण आत आल्यावर जणू काही बळीचा बकरा असल्याच्या थाटात सर्व तयारी सुरू करतात. अनावश्यक चाचण्या करून बिल वाढवायला सुरुवात होते. आधी केलेल्या चाचण्या असतील तरीही त्या परत परत करायला लावून निम्मा पैसा आधीच ओढला जात आहे. एवढे केल्यानंतर त्याला आपल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करून घ्यायचे आणि मग मनाला वाटेल तसे उपचाराच्या नावाखाली पैसे ओढायचे, ही पाॅलिसी सध्या काही खासगी कोरोना सेंटरची असल्याचे आता नातेवाईकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. रुग्णाचा प्राण त्याच्या नातेवाईकांना लाख माेलाचा वाटतो. पण पैशासाठी अशी दुकाने थाटल्यासारखी काेरोना सेंटर्स उघडून बसलेल्यांना मात्र, त्याचा प्राण कवडीमोलाचा वाटत असावा. म्हणूनच पैसे ओढून झाले आणि रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली की मग त्याला शासकीय रुग्णालयात किंवा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवायला सांगायचे. रुग्णाचे नातेवाईक त्याक्षणी अगतिक असतात. त्यामुळे आपल्या माणसाला वाचविण्यासाठी अनेक दिव्ये करायची त्यांची तयारी असते. मात्र, एवढे करूनही जेव्हा आपला माणूस रहात नाही, तेव्हा त्यांचा संयम तुटून पडतो. मात्र, बहुतांश नातेवाईक आपला माणूस गेला, मग आता पुढे जाऊन काय करायचे, असा विचार करून शांत बसतात. म्हणूनच अशा काही खासगी डाॅक्टरांचे फावते. त्यामुळेच पैशासाठी रुग्णांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या रत्नागिरीतही सुरू आहे.

खरेतर, डाॅक्टर म्हणजे रुग्णाकरिता प्राण वाचविणारा देवदूत असतो. पण सध्या कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि डाॅक्टर होण्यास पात्र नसलेल्या अशा खासगी डाॅक्टरांना कोरोना सेंटरची जबाबदारी देताना प्रशासनाने कुठलीच खातरजमा केली नसेल काय, त्यांना परवानग्या कशा दिल्या गेल्या, याविषयी आता नागरिकांकडूनच पोस्टमार्टेम करण्याची वेळ आली आहे.