शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दवाखाने की कसाईखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST

एखाद्या घरात कोरोनाबाधित असला तर दुर्दैवाने शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णांचे नातेवाईक हबकून जातात आणि ...

एखाद्या घरात कोरोनाबाधित असला तर दुर्दैवाने शासकीय रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण आणि त्याच्याबरोबर त्या रुग्णांचे नातेवाईक हबकून जातात आणि मग त्याला वाचविण्यासाठी जीवाचे रान करून चांगल्यात चांगल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी धडपड करतात. महागडे असले तरीही आपल्या माणसाचा जीव त्यापेक्षाही लाखमोलाचा आहे, असा विचार करून पैशाची जमवाजमव करतात. काही खासगी रुग्णालये तर आधी पैसे ओता आणि मग रुग्णाला आत आणा, अशी असंवेदनशीलता दाखवतात. रुग्ण आत आल्यावर जणू काही बळीचा बकरा असल्याच्या थाटात सर्व तयारी सुरू करतात. अनावश्यक चाचण्या करून बिल वाढवायला सुरुवात होते. आधी केलेल्या चाचण्या असतील तरीही त्या परत परत करायला लावून निम्मा पैसा आधीच ओढला जात आहे. एवढे केल्यानंतर त्याला आपल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करून घ्यायचे आणि मग मनाला वाटेल तसे उपचाराच्या नावाखाली पैसे ओढायचे, ही पाॅलिसी सध्या काही खासगी कोरोना सेंटरची असल्याचे आता नातेवाईकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. रुग्णाचा प्राण त्याच्या नातेवाईकांना लाख माेलाचा वाटतो. पण पैशासाठी अशी दुकाने थाटल्यासारखी काेरोना सेंटर्स उघडून बसलेल्यांना मात्र, त्याचा प्राण कवडीमोलाचा वाटत असावा. म्हणूनच पैसे ओढून झाले आणि रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली की मग त्याला शासकीय रुग्णालयात किंवा दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवायला सांगायचे. रुग्णाचे नातेवाईक त्याक्षणी अगतिक असतात. त्यामुळे आपल्या माणसाला वाचविण्यासाठी अनेक दिव्ये करायची त्यांची तयारी असते. मात्र, एवढे करूनही जेव्हा आपला माणूस रहात नाही, तेव्हा त्यांचा संयम तुटून पडतो. मात्र, बहुतांश नातेवाईक आपला माणूस गेला, मग आता पुढे जाऊन काय करायचे, असा विचार करून शांत बसतात. म्हणूनच अशा काही खासगी डाॅक्टरांचे फावते. त्यामुळेच पैशासाठी रुग्णांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार सध्या रत्नागिरीतही सुरू आहे.

खरेतर, डाॅक्टर म्हणजे रुग्णाकरिता प्राण वाचविणारा देवदूत असतो. पण सध्या कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि डाॅक्टर होण्यास पात्र नसलेल्या अशा खासगी डाॅक्टरांना कोरोना सेंटरची जबाबदारी देताना प्रशासनाने कुठलीच खातरजमा केली नसेल काय, त्यांना परवानग्या कशा दिल्या गेल्या, याविषयी आता नागरिकांकडूनच पोस्टमार्टेम करण्याची वेळ आली आहे.