शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा परिषद प्रश्नांवर आज मुंबईत चर्चा

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

पालकमंत्र्यांची उपस्थिती : रिक्त पदे, विंधन विहिरीबाबत निर्णय अपेक्षित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अनेक प्रलंबित विषयांपैकी काही अति महत्त्वाचे विषय शासनाकडे मांडून ते सोडवण्यासाठी दि. २० मार्च रोजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली.या बैठकीला अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, सर्व सभापती व काही सदस्य आणि सर्व विभागप्रमुख मुंबईला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये सन २००९-१०, २०११-१२ सालात तेराव्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. ही रक्कम पडून असून ती खर्च करण्याची मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची वर्ग-१, वर्ग-२ ची पदे दीड ते दोन वर्षे रिक्त आहेत. विंधन विहिरी खोदाईचे नवीन दर मान्यता मिळविण्यासाठी, लघुपाटबंधाऱ्यांच्या प्रस्तावित ५३ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांची अवश्यकता आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद निवड समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणि सर्व सभापती समिती सदस्यपदी असावेत, बदल्यांचे अधिकार अध्यक्ष, सभापतींना देण्यात यावेत, अशा विविध मागण्या या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळम यांनी सांगितले.जिल्हापरिषदेच्या अनेक विषयांवरील प्रश्नांची पूर्तता होण्याबाबत या बैठकीत काही सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही उपलब्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रलंबित विषयांवर होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही हाती लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)