शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

जिल्हा परिषद प्रश्नांवर आज मुंबईत चर्चा

By admin | Updated: March 19, 2015 23:52 IST

पालकमंत्र्यांची उपस्थिती : रिक्त पदे, विंधन विहिरीबाबत निर्णय अपेक्षित

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या अनेक प्रलंबित विषयांपैकी काही अति महत्त्वाचे विषय शासनाकडे मांडून ते सोडवण्यासाठी दि. २० मार्च रोजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम यांनी दिली.या बैठकीला अध्यक्ष जगदीश राजापकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, सर्व सभापती व काही सदस्य आणि सर्व विभागप्रमुख मुंबईला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या प्रलंबित विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये सन २००९-१०, २०११-१२ सालात तेराव्या वित्त आयोगातून अंगणवाडीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले होते. ही रक्कम पडून असून ती खर्च करण्याची मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची वर्ग-१, वर्ग-२ ची पदे दीड ते दोन वर्षे रिक्त आहेत. विंधन विहिरी खोदाईचे नवीन दर मान्यता मिळविण्यासाठी, लघुपाटबंधाऱ्यांच्या प्रस्तावित ५३ बंधाऱ्यांसाठी ५ कोटी ७५ लाख रुपयांची अवश्यकता आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची २१ पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद निवड समितीचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आणि सर्व सभापती समिती सदस्यपदी असावेत, बदल्यांचे अधिकार अध्यक्ष, सभापतींना देण्यात यावेत, अशा विविध मागण्या या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी काळम यांनी सांगितले.जिल्हापरिषदेच्या अनेक विषयांवरील प्रश्नांची पूर्तता होण्याबाबत या बैठकीत काही सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही उपलब्धी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या प्रलंबित विषयांवर होणाऱ्या चर्चेतून जिल्ह्यासाठी काही हाती लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)