शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

चिपळुणात महापुरानंतरही आपत्ती सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : पुराच्या तडाख्याने चिपळूण उद्ध्वस्त झाल्यानंतरही येथे आपत्तीची मालिका सुरूच आहे. एकीकडे महापुरात वाशिष्ठी नदीवरील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : पुराच्या तडाख्याने चिपळूण उद्ध्वस्त झाल्यानंतरही येथे आपत्तीची मालिका सुरूच आहे. एकीकडे महापुरात वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल खचल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद पडला आहे. याच महामार्गावरील परशुराम घाटातील रस्ता खचला असून, दसपटी विभागातील तिवरे येथे डोंगराला भेगा गेल्या आहेत. तर याच भागातील रस्त्यावर दरड कोसळली असून स्वयंदेव, दादरचा साकवही खचला आहे.

ढगफुटीमुळे येथे महापुराची परिस्थिती निर्माण होताच महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. महामार्गावरील शेकडो वाहने कापसाळ व फरशी तिठा येथे थांबवली होती. त्यातच वाशिष्ठी नदीवरील बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन पूल खचला व त्याचा भराव वाहून गेला. त्यामुळे महामार्गावरील वाहनांना एन्रॉन बायपास मार्गावरील पूल पर्याय होता. मात्र, वाशिष्ठी पुलापाठोपाठ हाही खचला. त्यामुळे महामार्गावरील वाहनांचा मार्ग पूर्णतः बंद झाला आहे. आता पूर ओसरल्यानंतरही शेकडो अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी आहेत.

एकीकडे महामार्गावरील वाहतूक ठप्प असताना आता याच मार्गावरील परशुराम घाटात रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावर अडकलेली वाहनेही परत मागे नेणे कठीण झाले आहे. येथेही तातडीने चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मदतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच तालुक्यातील तिवरे येथे २ जुलै २०१९ रोजी धरण फुटीची भीषण घटना घडली होती. आता याच अतिवृष्टीमुळे डोंगराला तडे गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय दसपटी विभागातील रस्त्यावर दरड कोसळली असून, स्वयंदेव, दादरचा साकवही खचला आहे. त्यामुळे काही वाड्यांचा संपर्क तुटला आहे.

-------------------------------

महामार्ग २४ तासांत सुरू करण्याचे प्रयत्न

महामार्गावरील खचलेला वाशिष्ठी पूल २४ तासांत खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पूल खचलेल्या ठिकाणी भराव व काँक्रिटच्या साहाय्याने बांधकाम करून हा मार्ग छोट्या वाहनांसाठी खुला केला जाणार आहे. तसेच नवीन पूल पंधरा दिवसांत खुला करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यात यावी, अशी सूचना तंत्र व शिक्षणमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीस केली.

-------------------------

चिपळुणात पेट्रोल, डिझेल टंचाई

चिपळूण शहर हद्दीत एकूण सहा पेट्रोल पंप असून त्यातील एकमेव पंप सुरू असून, उर्वरित पंपात महापुराचे पाणी गेले आहे. त्यामुळे एकाच पंपावर ताण आला आहे. तूर्तास या पंपातून केवळ शासकीय यंत्रणेसाठी वापरला जात आहे. त्यामुळे खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या वाहनांचा प्रश्न निर्माण झाला आहे.