शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

अजूनही ५१ गावात चालक-वाहकांची गैरसोय

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

एस. टी. महामंडळ : वस्तीला जाणाऱ्या गाडीच्या कर्मचाऱ्यांसमोर समस्या...

रत्नागिरी : परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे जिल्ह्यातील २०३ ठिकाणी रात्रवस्तीच्या फेऱ्या पाठवण्यात येतात. वस्तीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांना गावातील असुविधेचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील २०३ गावांपैकी १५२ गावांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अजूनही ५१ गावांमध्ये चालक-वाहकांची गैरसोय होत आहे.मंडणगड तालुक्यातील आवाशी, केळशी, पणदेरी मोहल्ला, भोळवली, उन्हवरे, खेड तालुक्यातील चोरवणे, शिरगाव, म्हाप्रळ, पोफळवणे, पन्हाळजे, तुळशी, बिरमणी, अकल्पे, सवणस, चिपळूण तालुक्यातील माखजन, वाघिवरे, स्वयंदेव, गांग्रई, वीर, कासई, चिखली, करंबणे, धायजेवाडी, तळवडे-गोवळ, खोपी-शिरगाव, मोरेवाडी, तिवडी, कोसबी, मालदोली, दुर्गवाडी, कुरवळजावळी, मूर्तवडे, नायशी वडेरू, पातेपिलवली, गुढे कोंडवी, सावर्डे, पाचांबे, तळसर, तोंडली, नांदिवसे, ताम्हणमळा, गुहागर तालुक्यातील मालगुंड, पांगरी, पाभरे, संगमेश्वर तालुक्यातील पिरदंवणे, आंबवली, करजुवे, कानरकोंड, कातुर्डी, निवळी नेदरवाडी, देवडे, तांबेडी, मुचरी, बामणोली, खडीकोळवण, ओझरे, मासरंग, फणसवळे, नायरी, तिवरे, चाफवली भटाचा कोंड, कुळ्ये पुनवर्सन, पाचांबे येडगेवाडी, बडदवाडी, धामापूर कुरजुवे, कासे, पेढांबे, तळेकांटे गावामध्ये अद्याप शौचालय सुविधा उभारण्यात आलेली नाही. लांजा तालुक्यातील घाटीवळे, गावडेआंबेरे, झर्ये, आजिवली, कोतापूर, इसवली, इंदवटी, कशेळी कोंडे, तर राजापूर तालुक्यातील भालवली, कुंभवडे, ताम्हाणे, चुनाकोळवण, नाणार, मोरोशी, तुळसुंदे, शिरसे, हातदे, वेत्ये, घाडीवाडी, काजिर्डा, जैतापूर, बुरंबेवाडी, भालावली गावात अद्याप असुविधा आहे. रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे. पूर्णगड, गावखडी, नाखरे खांबड, चांदोर, नाखरेस्वामी, गावखडी, गणेशगुळे, वरवडे, कोतवडे, वळके, जांभरूण, जयगडबंदर, वेळवंड, रीळउंडी, जांभारी, धामणये वरचे वरवडे, करबुडे - काजरेकोंड, देऊड, कुरतडे - तोणदे, करबुडे, सोमेश्वर तोणदे, खरवते, मालगुंड, डोर्ले, निरूळ - रिंगीची वाडी, वेतोशी, भोके - आंबेकरवाडी व मठवाडी येथे चालक - वाहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अद्याप ५१ गावांमध्ये प्रसाधनगृहाची असुविधा आहे. जिल्हा परिषदेकडून अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात येत असताना प्रसाधनगृहांचा अभाव दिसून येत आहे. वेळोवेळी एस. टी. कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारून मागणीकडे लक्ष वेधले होते. पैकी रत्नागिरी पंचायत समितीने याची दखल घेत अंमलबजावणी केल्याने तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी प्रसाधनगृहाची सुविधा उभारली आहे. (प्रतिनिधी)