शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

अजूनही ५१ गावात चालक-वाहकांची गैरसोय

By admin | Updated: February 10, 2015 00:01 IST

एस. टी. महामंडळ : वस्तीला जाणाऱ्या गाडीच्या कर्मचाऱ्यांसमोर समस्या...

रत्नागिरी : परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे जिल्ह्यातील २०३ ठिकाणी रात्रवस्तीच्या फेऱ्या पाठवण्यात येतात. वस्तीची गाडी घेऊन जाणाऱ्या चालक - वाहकांना गावातील असुविधेचा सामना करावा लागतो. जिल्ह्यातील २०३ गावांपैकी १५२ गावांमध्ये शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अजूनही ५१ गावांमध्ये चालक-वाहकांची गैरसोय होत आहे.मंडणगड तालुक्यातील आवाशी, केळशी, पणदेरी मोहल्ला, भोळवली, उन्हवरे, खेड तालुक्यातील चोरवणे, शिरगाव, म्हाप्रळ, पोफळवणे, पन्हाळजे, तुळशी, बिरमणी, अकल्पे, सवणस, चिपळूण तालुक्यातील माखजन, वाघिवरे, स्वयंदेव, गांग्रई, वीर, कासई, चिखली, करंबणे, धायजेवाडी, तळवडे-गोवळ, खोपी-शिरगाव, मोरेवाडी, तिवडी, कोसबी, मालदोली, दुर्गवाडी, कुरवळजावळी, मूर्तवडे, नायशी वडेरू, पातेपिलवली, गुढे कोंडवी, सावर्डे, पाचांबे, तळसर, तोंडली, नांदिवसे, ताम्हणमळा, गुहागर तालुक्यातील मालगुंड, पांगरी, पाभरे, संगमेश्वर तालुक्यातील पिरदंवणे, आंबवली, करजुवे, कानरकोंड, कातुर्डी, निवळी नेदरवाडी, देवडे, तांबेडी, मुचरी, बामणोली, खडीकोळवण, ओझरे, मासरंग, फणसवळे, नायरी, तिवरे, चाफवली भटाचा कोंड, कुळ्ये पुनवर्सन, पाचांबे येडगेवाडी, बडदवाडी, धामापूर कुरजुवे, कासे, पेढांबे, तळेकांटे गावामध्ये अद्याप शौचालय सुविधा उभारण्यात आलेली नाही. लांजा तालुक्यातील घाटीवळे, गावडेआंबेरे, झर्ये, आजिवली, कोतापूर, इसवली, इंदवटी, कशेळी कोंडे, तर राजापूर तालुक्यातील भालवली, कुंभवडे, ताम्हाणे, चुनाकोळवण, नाणार, मोरोशी, तुळसुंदे, शिरसे, हातदे, वेत्ये, घाडीवाडी, काजिर्डा, जैतापूर, बुरंबेवाडी, भालावली गावात अद्याप असुविधा आहे. रत्नागिरी तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी शौचालयांची सुविधा उपलब्ध केली आहे. पूर्णगड, गावखडी, नाखरे खांबड, चांदोर, नाखरेस्वामी, गावखडी, गणेशगुळे, वरवडे, कोतवडे, वळके, जांभरूण, जयगडबंदर, वेळवंड, रीळउंडी, जांभारी, धामणये वरचे वरवडे, करबुडे - काजरेकोंड, देऊड, कुरतडे - तोणदे, करबुडे, सोमेश्वर तोणदे, खरवते, मालगुंड, डोर्ले, निरूळ - रिंगीची वाडी, वेतोशी, भोके - आंबेकरवाडी व मठवाडी येथे चालक - वाहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अद्याप ५१ गावांमध्ये प्रसाधनगृहाची असुविधा आहे. जिल्हा परिषदेकडून अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात येत असताना प्रसाधनगृहांचा अभाव दिसून येत आहे. वेळोवेळी एस. टी. कर्मचारी संघटनांनी आंदोलन पुकारून मागणीकडे लक्ष वेधले होते. पैकी रत्नागिरी पंचायत समितीने याची दखल घेत अंमलबजावणी केल्याने तालुक्यातील ३४ गावांपैकी २९ गावांनी प्रसाधनगृहाची सुविधा उभारली आहे. (प्रतिनिधी)