शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

‘डिजिटल इंडिया’चा निर्णय ग्रामसभांच्या खांद्यावर

By admin | Updated: July 2, 2015 22:46 IST

कोणत्याही दिवशी गावची सभा बोलावणार

रत्नागिरी : डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो राज्यात ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये दि. ६ ते ८ जुलै यापैकी कोणत्याही एका दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना शासनाकडून देण्यात आली आहे. हा कालबध्द कार्यक्रम राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींची माहिती, लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक, कालावधी यांची माहिती संग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाच्या सहाय्याने सर्वच नागरिकांना संगणकीय लॉकर्स उघडून देण्यात येणार आहे. शहर परिसरातील नागरिकांना वेळोवेळी लागणारे दाखले, महत्त्वाची कागदपत्र नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक संगणकीय लॉकर्समध्ये विनामोबदला उपलब्ध करुन देण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतची जनजागृती व माहिती दि. ६ ते ८ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. (शहर वार्ताहर)राज्य शासनाने सन २०१५ हे वर्ष डिजिटलाईज्ड कालबध्द सेवा वर्ष २०१५ म्हणून घोषित केले आहे. यात सर्व उपक्रमांबद्दल माहिती देणे, ई-गव्हर्नन्सअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम एका छताखाली आणणे. यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षित करुन या उपक्रमामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.