शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल इंडिया’चा निर्णय ग्रामसभांच्या खांद्यावर

By admin | Updated: July 2, 2015 22:46 IST

कोणत्याही दिवशी गावची सभा बोलावणार

रत्नागिरी : डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो राज्यात ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये दि. ६ ते ८ जुलै यापैकी कोणत्याही एका दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना शासनाकडून देण्यात आली आहे. हा कालबध्द कार्यक्रम राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींची माहिती, लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक, कालावधी यांची माहिती संग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाच्या सहाय्याने सर्वच नागरिकांना संगणकीय लॉकर्स उघडून देण्यात येणार आहे. शहर परिसरातील नागरिकांना वेळोवेळी लागणारे दाखले, महत्त्वाची कागदपत्र नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक संगणकीय लॉकर्समध्ये विनामोबदला उपलब्ध करुन देण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतची जनजागृती व माहिती दि. ६ ते ८ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. (शहर वार्ताहर)राज्य शासनाने सन २०१५ हे वर्ष डिजिटलाईज्ड कालबध्द सेवा वर्ष २०१५ म्हणून घोषित केले आहे. यात सर्व उपक्रमांबद्दल माहिती देणे, ई-गव्हर्नन्सअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम एका छताखाली आणणे. यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षित करुन या उपक्रमामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.