शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी डिजिटल बोर्ड

By admin | Updated: October 14, 2015 00:03 IST

भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही,

गुहागर : समुद्राच्या भरती - ओहोटीची वेळ बदलती असल्याने गुहागर समुद्र किनाऱ्यावर डिजिटल बोर्डद्वारे वेळ सूचित करण्यासाठी पुढील काळात डिजिटल बोर्ड बसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ही माहिती प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी दिली.गुहागर समुद्रकिनारी येणारे पर्यटक अतिउत्साहाने समुद्र स्नानासाठी उतरतात. मात्र, खोल पाण्यात गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू होतो. हे प्रकार रोखण्यासाठी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी गुहागरमध्ये निमंत्रितांची विशेष बैठक घेऊन त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा केली.यावेळी हजारे म्हणाले की, भारतातील अनेक समुद्रकिनारे मी पाहिले आहेत. यामध्ये गुहागरचा समुद्रकिनारा धोकादायक नाही, येथे पाण्याला उतार नाही, असे माझे मत आहे. येणारे पर्यटक हे अतिउत्साहाच्या भरात खोलवर पाण्यामध्ये जातात. समुद्राच्या भरती - ओहोटीच्या वेळी पाण्यामधील होणाऱ्या बदलाबाबत पर्यटक अनभिज्ञ असतात. अशावेळी पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे.यावेळी निसर्गाशी मस्ती करु नका, अशा आशयाचे फलक लावावेत, अशी सूचना राजन दळी यांनी केली. यावर नगरपंचायत व बंदर विभागामार्फत समुद्रकिनाऱ्यावरील प्रवेशाचा भाग व जेटीवर फलक लावणे तसेच हे फलक आकर्षक व एकाच रंगाचे असावेत, असे सुचवण्यात आले.नगरपंचायतीतर्फे सुरक्षेसाठी ४० लाईफ जॅकेट देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष जयदेव मोरे यांनी जाहीर केले. आॅक्टोबर ते जून या कालावधीत पर्यटकांसाठी स्पीडबोट सेवा सुरू असते. मागील दोन वर्षात या कालावधीमध्ये बुडणाऱ्या पर्यटकांना वेळीच पोहोचून बाहेर काढण्याने अनेकांचे जीव वाचल्याचे व्यवस्थापक मयुरेश साखरकर यांनी सांगितले. पुढील काळात एकही अपघात होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.जेटीजवळील भागात पाण्याचा प्रवाह बदलून व खोलवर पाण्यात गेल्याने पर्यटक प्राणास मुकले आहेत. ेअशावेळी जेटीजवळील काही मीटर भाग हा निषिद्ध क्षेत्र करावा तसेच एक विशिष्ट जागा ठरवून येथील प्रवेश बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.सागरी सुरक्षारक्षक तसेच यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना वेगळी ओळखपत्र देता येतील, असे पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा करण्यात आली. गहागरला सुरक्षित पर्यटन करुया, असे आवाहन शेवटी प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी केले.यावेळी नगराध्यक्ष जयदेव मोरे, सभापती राजेश बेंडल, तहसीलदार वैशाली पाटील, अ‍ॅड. संकेत साळवी, राजन दळी, राजेंद्र आरेकर, नरेश पवार, श्यामकांत खातू, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, गटविकास अधिकारी बी. ई. साठे, बंदर विभागाचे अभिजीत गोळे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)गोवा तसेच इतर समुद्री पर्यटन भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रात डुंबत असताना येथे कायम सुरक्षा रक्षक देखरेख करत असतात. किती पाण्यात जावे, कुठे पोहू नये अशा प्रकारच्या सूचना करत असल्याने येथे अपघात होत नाहीत अशा प्रकारची सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी प्रामुख्याने मागणी करण्यात आली. यावर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपंचायत कंत्राटी सुरक्षारक्षकनेमण्याबाबत पुढाकार घेईल, असे सांगितले.