शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

हुकूमशाही वाढली, विद्यार्थीहिताला तिलांजली

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

वरवडे शिक्षण मंडळ : आर्थिक अफरातफर अन् संस्थेच्या कारभाराची बेफिकिरी--शिक्षणात हुकूमशाही-२

रत्नागिरी : वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली खरी; पण गेल्या काही दिवसात अध्यक्ष आणि माध्यमिक विद्यालय, वरवडेचे मुख्याध्यापक यांच्या बेपर्वाई आणि हुकूमशाही कारभारामुळे सध्या संस्थेतच गोंधळ निर्माण झाला असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.संस्थेचे अध्यक्ष शरद बोरकर यांच्या मनमानी कारभाराबाबत संस्थेच्या कार्यकारी मंडळातच धुसफूस सुरू आहे. पायकाअंतर्गत एक लाख रुपयांचा निधी वरवडे ग्रामपंचायतीकडे मैदान बनवण्याकरिता २०१४मध्ये वर्ग केला होता. हा निधी ग्रामपंचायतीकडून माध्यमिक विद्यालय, वरवडे या शाळेच्या मैदानासाठी खर्च करण्याचे ठरले. मात्र, मे २०१५पर्यंत शालेय मैदानाचे कोणतेही काम झालेले नाही. या मैदानाचा ठेका समीर शरद बोरकर यांच्याकडे आहे. अंदाजे केवळ ६ लोड चिरा व १ ब्रास पांढरी वाळू मैदानात पडली आहे. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांना संस्थेच्या अन्य सदस्यांनी निवेदन सादर केले आहे.१२ मार्च २०१४ ते ८ मार्च २०१५ या कालावधीत मंडळाची एकही बैठक झालेली नाही. १२ मार्चच्या झालेल्या बैठकीत त्यापूर्वीच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्याला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत केवळ दोन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला. हा वाद वाढल्याने अध्यक्ष बोरकर हे स्वत: बैठकच सोडून निघून गेले. त्यामुळे बैठक झाली नाही. १९ जानेवारी २0१४ रोजीच्या बैठकीत इतर सदस्यांनी सचिवांना दूरध्वनीव्दारे बैठकीला येण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे उशिर होत असल्याचे कळवूनही अध्यक्षांनी बैठक सोडून दिली व जाताना इतिवृत्ताची वहीदेखील घेऊन गेले. त्यानंतर माजी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सचिव व इतर सदस्यांनी सभा घेतली. नऊपैकी आठ सदस्यांनी ही सभा घेऊनही ती अध्यक्षांनी ग्राह्य धरली नाही.अशा अनेक कारणांनी अध्यक्षांची मनमानी सुरू असल्याने संस्थेने शैक्षणिक संकुलांकडे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याऐवजी परस्परांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते. संस्थेच्या सदस्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या. अगदी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा निकालही अध्यक्षांविरोधात गेला. तरीही अध्यक्षांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे संस्थेचे हित बाजूलाच केवळ स्वत:चं हित साधण्यामध्येच संस्थाध्यक्ष मशगुल असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकांवरही आरोपमाध्यमिक विद्यालय, वरवडेच्या मुख्याध्यापकांवरही याप्रकरणी आरोप आहेत. शाळेच्या बँक खात्यातून अनेकवेळा विनापरवानगी पैसे काढण्यात आले आहेत. त्यासाठी व्यवस्थापक मंडळाची मंजुरीही घेण्यात आलेली नाही. हे पैसे कोणत्या कारणासाठी काढण्यात आले, याचेही मुख्याध्यापकांकडे उत्तर नसल्याने कार्यकारिणीने आक्षेप नोंदवले आहेत. याच ठिकाणी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशार्थी विद्यार्थ्यांकडून देणगी उकळली जात असून, त्याची पावतीही दिली जात नाही. याबाबत मुख्याध्यापकांविरोधात पालकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केल्याचे समजते.