शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

देवाचा डोंगर धनगरवाडी पाणीटंचाई मुक्त

By admin | Updated: March 30, 2017 16:24 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे वाडीत मुबलक पाणी

आॅनलाईन लोकमतखेड, दि. ३0 : तालुक्यातील ४० धनगरवाड्यांचा पाणीप्रश्न पेटू लागला आहे. मात्र, वर्षानुवर्षे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या देवाचाडोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न यावर्षी निकाली निघाला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे या वाडीत मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, ग्रामस्थांची पाण्याची तहान भागण्यास मदत झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली असतानाही प्रशासनाने प्रलंबित ठेवलेल्या सहा धनगरवाड्यांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, वषानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या देवाचा डोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांना आता मुबलक पाणी मिळत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत या वाडीला तब्बल दोन विहिरी बांधून मिळाल्या असून, या दोन्ही विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४०पैकी एक धनगरवाडी पाणीटंचाईपासून कायमची मुक्त झाली आहे. येथील शेतकरी बाबू बावधाने यांनी याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

देवाचा डोंगर धनगरवाडीतील सर्वच ग्रामस्थांना सुमारे पच किलोमीटर अंतरावरून सातारा जामगे येथून पाणी आणावे लागते. ज्यांची दुचाकी किंवा तीनचाकी गाडी असेल त्यांनाच हे शक्य होते. सर्वांचाच भातशेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. जोडीला हे लोक शेळी पालनाचा व्यवसायही करतात. मात्र, पाण्याची समस्या असल्याने त्यांच्या या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपावेतो हा समाज आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेने देवाचा डोंगर येथील धनगरवाडीला आशेचा किरण दाखवला आहे.

या वाडीला दोन विहिरी मंजूर झाल्या आणि ग्रामस्थांनीच पाण्याची जागा शोधली. यानंतर प्रशासनाने तसा अहवाल तयार केल्यानंतर वाडीला या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित करण्यात आले. डिसेंबर २०१६मध्येच दोन्ही विहिरी पाण्याने भरल्या. आता मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा या विहिरींमध्ये असल्याचे बावधाने यांनी सांगितले. यामुळे या पाण्याच्या आधारे आता शेळी पालन व दुधाचा व्यवसाय करणे सहज व सोपे होईल, असेही ते म्हणाले. या वाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. (प्रतिनिधी)