शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

देवाचा डोंगर धनगरवाडी पाणीटंचाई मुक्त

By admin | Updated: March 30, 2017 16:24 IST

राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे वाडीत मुबलक पाणी

आॅनलाईन लोकमतखेड, दि. ३0 : तालुक्यातील ४० धनगरवाड्यांचा पाणीप्रश्न पेटू लागला आहे. मात्र, वर्षानुवर्षे पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या देवाचाडोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न यावर्षी निकाली निघाला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेमुळे या वाडीत मुबलक पाणी उपलब्ध झाले असून, ग्रामस्थांची पाण्याची तहान भागण्यास मदत झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली असतानाही प्रशासनाने प्रलंबित ठेवलेल्या सहा धनगरवाड्यांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, वषानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या देवाचा डोंगर धनगरवाडीतील ग्रामस्थांना आता मुबलक पाणी मिळत आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत या वाडीला तब्बल दोन विहिरी बांधून मिळाल्या असून, या दोन्ही विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४०पैकी एक धनगरवाडी पाणीटंचाईपासून कायमची मुक्त झाली आहे. येथील शेतकरी बाबू बावधाने यांनी याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.

देवाचा डोंगर धनगरवाडीतील सर्वच ग्रामस्थांना सुमारे पच किलोमीटर अंतरावरून सातारा जामगे येथून पाणी आणावे लागते. ज्यांची दुचाकी किंवा तीनचाकी गाडी असेल त्यांनाच हे शक्य होते. सर्वांचाच भातशेती आणि दुधाचा व्यवसाय आहे. जोडीला हे लोक शेळी पालनाचा व्यवसायही करतात. मात्र, पाण्याची समस्या असल्याने त्यांच्या या व्यवसायावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजपावेतो हा समाज आपल्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिला होता. मात्र, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेयजल योजनेने देवाचा डोंगर येथील धनगरवाडीला आशेचा किरण दाखवला आहे.

या वाडीला दोन विहिरी मंजूर झाल्या आणि ग्रामस्थांनीच पाण्याची जागा शोधली. यानंतर प्रशासनाने तसा अहवाल तयार केल्यानंतर वाडीला या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निश्चित करण्यात आले. डिसेंबर २०१६मध्येच दोन्ही विहिरी पाण्याने भरल्या. आता मे महिन्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा या विहिरींमध्ये असल्याचे बावधाने यांनी सांगितले. यामुळे या पाण्याच्या आधारे आता शेळी पालन व दुधाचा व्यवसाय करणे सहज व सोपे होईल, असेही ते म्हणाले. या वाडीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यात यश आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. (प्रतिनिधी)