शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

शहरप्रमुखपद वाचविण्यासाठी देवळेकरांची धडपड

By admin | Updated: November 5, 2015 00:10 IST

कदम-होमकळस : भैरीसमोर खुलासा करण्याचे आव्हान...

चिपळूण : युतीचे शासन सत्तेवर आल्यावर आश्वारूढ पुतळ्याबाबत शहरप्रमुख देवळेकर यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी देण्यात आली. आवश्यक ते सहकार्य नगर परिषदेने करण्याचे ठरले. पण, त्यांनी साधी फाईलही हलवली नाही. देवळेकर हे सभागृहात एक बोलतात व सभागृहाबाहेर दुसरे बोलतात. शहरातील अनेक प्रकल्प रखडले, त्या प्रलंबित कामाच्या मागे पोटठेकेदार कोण? त्याचा भैरीच्या मंदिरात येऊन खुलासा करावा. आपले शहरप्रमुखपद वाचवण्यासाठी देवळेकर यांनी केलेली ही केविलवाणी धडपड आहे, असा आरोप नगराध्यक्षा सावित्री होमकळस व गटनेते राजेश कदम यांनी केला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख व नगर परिषदेचे गटनेते राजू देवळेकर यांनी सत्ताधारी पक्षावर धादांत खोटे आरोप केले आहेत. त्यांना विकासकामावर बोलण्याचा किंवा आरोप करण्याचा अधिकार नाही, हे सांगण्यासाठी नगर परिषदेत सत्ताधारी पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी गटनेते कदम पुढे म्हणाले, शहरातील रस्ते काँक्रीट करण्यासाठी निधी हवा होता. आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, सरकार बदलले. म्हणून देवळेकर यांना चार वेळा प्रस्ताव दिले. परंतु, त्यांच्याकडून त्याचा पाठपुरावा झाला नाही. ते काही करू शकले नाहीत, हे त्यांचे बिंग पालकमंत्र्यांसमोर फुटेल व आपली खरडपट्टी होईल, या भीतीने पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला उपस्थित न राहता देवळेकर यांनी पळ काढला, अशी खिल्ली कदम यांनी उडवली. आता विदर्भातील दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने निधी वळवल्यामुळे निधी येणार नसल्याने काही कामे प्रलंबित आहेत. माजी आमदार कदम पालिकेत बसून काहीच झाले नाही, असे ते म्हणतात तेही चुकीचे आहे. जनतेच्या कामासाठी व विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाई पालिकेत येतात. ठेकेदारांची बिले काढा, हे सांगण्यासाठी येत नाहीत. पर्यटनासह अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामागे पोटठेकेदार कोण आहे, त्याचा भैरीच्या मंदिरात येऊन खुलासा करावा आणि मगच त्यांनी विकासकामांबद्दल बोलावे. आपण नगर परिषदेचे ट्रस्टी असल्याने सर्वांनीच विकासकामासाठी प्रयत्न करायला हवेत. आम्ही मंत्रालयात अनेकवेळा फेऱ्या मारल्या आहेत. आता तुम्ही मारा. ९ वर्षे झाली तरी देवळेकर यांना म्युनिसिपल अ‍ॅक्ट समजला नाही. त्यांच्यासाठी स्पेशल प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही खर्च करू, असेही कदम म्हणाले. पालकमंत्र्यांच्या अभिनंदन ठरावाबाबत ते म्हणाले, सभाशास्त्राला धरून देवळेकर यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला नाही. दुखवटा, अभिनंदनाचा ठराव झाल्यानंतर इतिवृत्त मंजूर झाले. पहिले दोन विषय संपले. त्यानंतर देवळेकर यांना जाग आली. त्याच दरम्यान इनायत मुकादम यांचा विषय झाला होता. त्यामुळे हा अभिनंदनाचा ठराव झाला नाही. मुकादम यांनी आयत्यावेळच्या विषयात विषय काढला असता, तर त्यावर चर्चा झाली असती. नगराध्यक्षा बोलायला सर्वांना समान संधी देतात. दुसरा विषय सुरु झाल्यानंतर मुकादम पत्र वाचू लागले. नगराध्यक्षांनी सांगूनही ते जागेवर बसले नाहीत. उलट किंचाळून जोरजोरात बोलू लागले. त्यांनी अध्यक्षांचा अवमान केला म्हणून अध्यक्षांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. ते बाहेर गेले असते, तर त्याबाबत फेरविचार झाला असता. परंतु, ते सांगून ऐकत नव्हते. त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)देवळेकर यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी किती पैसे दिले ते जरा जाहीर करावेत. उलट खासदार अनंत गीते यांनी १० लाखाचा निधी शहराला दिला. आश्वारुढ पुतळ्याची जबाबदारी देऊनही त्यांनी अजून काही हालचाली केल्या नाहीत, असे कदम म्हणाले.आमदार भास्कर जाधव व माजी आमदार रमेश कदम या दोघांच्या भांडणात शहराचा विकास खुंटला, हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. आम्ही पक्षाच्या माध्यमातून बराचसा निधी आणला आहे, असे नगराध्यक्षा होमकळस यावेळी म्हणाल्या.