शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

तोडफोडप्रकरणी १८ अटकेत, वातावरण शांत

By admin | Updated: September 22, 2015 23:56 IST

श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मूर्ती बाहेर काढून विटंबना केल्याप्रकरणी सय्यदवाडीतील चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गावी नदीपात्रात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर मूर्ती बाहेर काढून विटंबना केल्याप्रकरणी सय्यदवाडीतील चार अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद अलोरे पंचक्रोशीत उमटले. त्यातून झालेल्या हिंसक घटनेत दंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर अलोरे पंचक्रोशी मंगळवारी शांत झाली होती.सोमवारी सायंकाळी ५.३० वाजता कुंभार्ली ग्रामस्थांनी गणेश विसर्जन केल्यानंतर सय्यदवाडीतील तरुणांनी मूर्ती बाहेर काढून बाजूला टाकल्याचे पाहिले. काहींनी त्याचे छायाचित्र काढले. हा प्रकार पंचक्रोशीत सगळीकडे समजताच या तरुणांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. एकीकडे पोलीस ठाण्यात ५०० हून अधिक ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. जमावाचा आक्रमकपणा पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी अधिक पोलीस कुमक मागवली व जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तत्काळ फिर्याद दाखल केल्यावर आरोपींना अटक करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी यावेळी वारंवार आवाहन करुनही जमाव शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही काळ रास्ता रोको तर काही वेळ घोषणाबाजी सुरुच राहिली. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली. जमावातील प्रत्येकाचे नाव जाणून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याचवेळी ताब्यात घेतलेल्या सय्यदवाडीतील अल्पवयीन तरुणांना चिपळूण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यामध्ये सय्यदवाडीतील चार अल्पवयीन युवकांचा समावेश आहे. याबाबत संदेश विनायक कोलगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. रात्री ९.३० नंतर विविध गावातून तरुण कार्यकर्ते दाखल झाले. दोन एसआरपी बटालियन असतानाही पोफळी नाका, कुंभार्ली, शिरगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त जमावाने दोन एस. टी. बसेस व एक प्रशिक्षण वाहन यांच्या काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. याप्रकरणी कॉन्स्टेबल स्वप्नील साळवी यांच्या फिर्यादीनुसार दोन अल्पवयीन तरुणांसह अमिर यशवंत पवार (२२), सतीश श्रीराम सावंत (२४), सुजित प्रभाकर मेस्त्री (४२), किरण किशोर होडे (२२), राहुल दीपक राजेशिर्के (२२), नीलेश सखाराम सावंत (२९), विनायक यशवंत शिंदे (४७), समीर शांताराम खांबे (२८), राजेंद्र रघुनाथ खेतले (३९), शैलेश बबन चव्हाण (३२), प्रवीण प्रल्हाद खेतले (३१), महेश राजाराम सावंत (३४) यांना अटक करण्यात आली आहे.अद्याप ६० ते ७० जणांवर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अटक केलेल्या अल्पवयीन तरुणांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले. (वार्ताहर)शिरगाव पोलीस ठाण्यावर रात्री संतप्त जमावाने चाल केल्यावर परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ही घटना स्थानिक असल्याने आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, पोफळीचे सरपंच चंद्रकांत सुवार, डॉ.शिवाजी मानकर, संदीप कोलगे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष मयुर खेतले व अन्य प्रतिष्ठीत ग्रामस्थ पोलीस ठाण्यात हजर होते. त्यांनी जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला. आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे, तहसीलदार वृषाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेतली. बैठकीत पोफळी, अलोरे पंचक्रोशीतील सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीसपाटील अशा १२५ जणांनी हजेरी लावली. शिरगाव, अलोरे, पोफळी पंचक्रोशीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय यंत्रणा व पोलीस सतर्क आहेत. कुंभार्ली येथे घडलेली घटना या विभागातील पहिलीच घटना असल्याने व या भागात तीन गावात असलेला परस्पर सलोखा याचा विचार करता या प्रकरणाबाबत कमालीचा संयम पाळण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाला कोणताही रंग लागू नये, याची पुरेशी खबरदारी घेतली जात आहे.गणेशमूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी चार अल्पवयीन तरुणांना दिला जमावाने चोप. संतप्त जमावाची आरोपींच्या अटकेसाठी शिरगाव पोलीस ठाण्यावर धडक. रात्री उशिरापर्यंत जमाव गणपती बाप्पा मोरया... म्हणत पोलीस ठाण्याच्या आवारात. दोन एस. टी. बसेस व एका प्रशिक्षण वाहनाच्या तरुणांनी काचा फोडल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. आज परिस्थिती नियंत्रणात असल्याने शांतता कमिटीची बैठक घेऊन बंदोबस्त केला शिथिल. ६ अल्पवयीन तरुणांना बालसुधारगृहात पाठविले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी केले प्रयत्न.