शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

माथाडी कामगारांच्या नशिबी आजही उपेक्षित जीवन

By admin | Updated: November 2, 2014 00:49 IST

अनिल शिंदे : अनेक योजनांपासून हमाल वंचित असल्याची खंत

चिपळूण : वाढत्या महागाईबरोबर हमालीचे दर वाढत नसल्याने माथाडी कामगारांच्या उत्पन्नावर मर्यादा आहे. शासनाने माथाडी बोर्ड स्थापन करुन हमाली करणाऱ्यांच्या कामाचा सन्मान केला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातील माथाडी कामगार आजही अनेक योजनांपासून वंचित असल्याची खंत चिपळूण हमाल पंचायतीचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. हमाली करणाऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने २००५मध्ये राज्य शासनाने माथाडी बोर्डाची स्थापना केली. या बोर्डाच्या माध्यमातून माथाडी कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न राज्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही माथाडी बोर्डाच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरु आहे. चिपळूण येथील माथाडी कामगार बाजारपेठ खडपोली एमआयडीसी, खेर्डी बाजारपेठ ट्रान्सपोर्ट मार्बल लोखंड, सिमेंट याची चढउतार करीत असतात. यासाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. हमाली हे कष्टाचे काम आहे. घाम गाळून आम्ही मोबदला कमावत असतो. आम्हांला जादा नको मात्र योग्य मोबदला मिळावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. बहादूरशेख नाका येथे शासकीय जागेमध्ये हमाल पंचायतीचे कार्यालय गेली २५ वर्षे सुरु आहे. ही जागा हमाल पंचायतीला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी हमाल पंचायतीला सहकार्य केले आहे. सध्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीही सहकार्याबरोबरच मार्गदर्शनही केले आहे. रस्ता चौपदरीकरणामध्ये काही जागा जात असल्याने उर्वरित जागा हमाल पंचायत कार्यालयाला देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे, असे शिंदे म्हणाले. माथाडी कामगारांसाठी पुणे, मुंबई, वाशी येथे माथाडी भवन उभारण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी घरेही देण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी माथाडी भवन, रुग्णालयाची व्यवस्था, मुलांसाठी हॉस्टेल आदी सुविधा होणे आवश्यक आहे. माजी अन्नपुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी ७ जिल्ह्यामध्ये रेशनिंग धान्य चढउतारासाठी देण्यात आलेला ठेका रद्द केला व ते काम माथाडी कामगारांना दिले गेले. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेशन धान्य चढउतारासाठी केली जाणारी ठेकेदारी पद्धत बंद करुन हे काम थेट माथाडी कामगारांना द्यावे, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)