शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बसफेरीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

राजापूर : जैतापूर येथून सुटणारी जैतापूर - सांगली ही बसफेरी सुरु करण्याची मागणी जैतापूर ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही ...

राजापूर : जैतापूर येथून सुटणारी जैतापूर - सांगली ही बसफेरी सुरु करण्याची मागणी जैतापूर ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. ही गाडी यापूर्वी बारमाही सुरु होती. परंतु, ही गाडी बंद झाल्याने शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही गाडी सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

रस्त्याचे काम अपुरे

दापोली : तालुक्यातील दाभोळ बाजारपेठेतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पहिल्याच पावसाने या रस्त्यावरील खड्डे अधिक वाढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना त्रासदायक होत आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने या खड्ड्यांचे आकारही वाढले आहेत. सध्या रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळेल, असे वाटत नाही.

बस आजपासून सुरु

राजापूर : येथील एस. टी. आगाराने गुरुवार, ८ जुलैपासून आंबोळगड - कोल्हापूर ही बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ वाजता आंबोळगड येथून ही बस सुटणार असून, नाटे - धाऊलवल्ली राजापूर - पाचल अणुस्कुरामार्गे कोल्हापूरला जाणार आहे. या फेरीचा लाभ घेण्याचे आवाहन आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी केले आहे.

बामणोलीत वृक्षारोपण

चिपळूण : तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता मंदिर ट्रस्ट, बामणोली मैत्रीबंद समूह आणि पर्यावरणप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने बामणोली येथे रविवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा दोन गटात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

दुबार पेरणीचे संकट

दापोली : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाणथळ जागेतील लावणी झाली असली तरी आता रोपेसुद्धा सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. अजूनही पावसाची हीच स्थिती राहिली तर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.

उमेश मोहिते यांना पुरस्कार

रत्नागिरी : गोंदिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत रत्नागिरीतील उमेश मोहिते यांना उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ‘नारीशक्तीला सलाम’ या कवितेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विहिरीची स्वच्छता

देवरुख : येथील नगर पंचायत क्षेत्रातील परशरामवाडीमधील सार्वजनिक विहिरीची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. परिसरातील झाडांचा पालापाचोळा विहिरीत पडल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. परंतु, या वाडीतील विद्यार्थ्यांनी विहिरीची स्वच्छता केली आहे.

ऊन - पावसाचा खेळ

रत्नागिरी : सध्या पावसाचा श्रावण महिन्याप्रमाणे ऊन - पावसाचा खेळ सुरु झाला आहे. या आठवड्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील लावण्यांची कामे रखडली आहेत. दि. ९ जुलैनंतर मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत असल्याने आता शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे.

परीक्षेचा निकाल रखडला

देवरुख : सार्वजनिक आरोग्य विभागाने ५० टक्के पदभरतीची परीक्षा कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असताना घेतली होती. मात्र, चार महिने होऊन गेले तरीही याचा निकाल अजून लागलेला नाही. ग्रामविकास विभागांतर्गत ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल कधी लागणार आणि पदभरती कधी होणार, याची प्रतीक्षा आहे.

रस्त्याशेजारी चिखल

रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत चर खणल्याने पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. शहरातील मारुती मंदिर ते माळनाका भागात मुख्य रस्त्याच्या शेजारी चर खणून ते थातूरमाातूररित्या भरण्यात आले आहेत. पावसाळ्यात या चरांमध्ये पाणी भरल्याने रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य आहे. दुकानांसमोरही हीच स्थिती असल्याने नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे.