शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

जिल्ह्यातील लोकसंख्येचा वृद्धीदर होतोय कमी

By admin | Updated: July 11, 2014 00:05 IST

सजगता वाढली : साक्षरता, मर्यादित कुटुंब संकल्पनेचे यश

शोभना कांबळे-  रत्नागिरी . बदलत्या आधुनिक काळानुरूप समाजातही परिवर्तन होऊ लागले आहे. समाज साक्षरतेकडे झपाट्याने जाऊ लागला. मात्र, महागाईचाही आलेख तेवढाच उंचावत असल्याने आर्थिकदृष्टीने समाजातील काही संकल्पनांना छेद देण्याची वेळ आली. त्यातील महत्त्वाची संकल्पना म्हणजे मर्यादित कुटुंब. याबाबत समाजात सजगता वाढल्याने जिल्ह्याच्या लोकसंख्येत घट झाल्याचे चित्र २०११ साली झालेल्या जनगणनेवरून दिसून येते. त्याचबरोबर कोकण रेल्वेच्या निर्मितीमुळे अर्थार्जनासाठी बाहेर जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. १९९१ ते २००० या कालावधीत लोकसंख्या वाढीचा वेग ९.८९ टक्के इतका होता. २००१ साली झालेल्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या १६ लाख ९७ हजार ७७७ इतकी होती. त्यापैकी १५ लाख ०४ हजार ५६८ इतकी लोकसंख्या ग्रामीण भागात होती. शहराची लोकसंख्या १ लाख ९२ हजार २०९ इतकी होती. गेल्या दहा वर्षात म्हणजेच २००१ ते २०१० या दशकातील लोकसंख्या १६ लाख १५ हजार ०६९ झाली असून, आताचा वृद्धीदर (-) ४.९६ इतका कमी झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील लोकसंख्येत घट झाली असून, आता १३ लाख ५१ हजार ३४६ इतकी आहे. म्हणजेच लोकसंख्या १,५३,२२२ने घटली आहे. शहरी भागात केवळ २२८३ ने वाढ झाली आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे मर्यादित कुटुंबाची संकल्पना. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे पूर्वी ‘हम दो हमारे दो’ हा विचारही आता बाजुला पडू लागला असून, ‘हम दो हमारा एक’ या विचारांवर आता बरीच दाम्पत्ये ठाम असलेली दिसतात. यात शासनाच्या या संकल्पनेचेही यश मानायला हरकत नाही. तसेच पती-पत्नी दोघेही अर्थार्जन करणारे असल्याने सर्वच दृष्ट्या कुटुंबातील सदस्य संख्या कमी असण्यावर अधिक भर दिला जात आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वेचा परिणामही जिल्ह्यातील लोकसंख्या कमी होण्यावर झाल्याचे दिसून येते. कारण आता अर्थार्जनासाठी इतर ठिकाणी जाण्याची मानसिकता वाढू लागली आहे.......१९९१ ते २००० या दशकात लोकसंख्या वाढीचा दर ९.८९ इतका होता, तर २००१ ते २०१० या दशकात तो ४.९६ इतका कमी झाला. तालुका२००१२०११मंडणगड७०,५९३६२,१२३दापोली१,९३,४३०१,७८,३४०खेड१,९४,५१५१,८१,६१५चिपळूण२,८१,०८१२,७९,१२२गुहागर१,४२,२५९१,२३,२०९रत्नागिरी३,०२,२६१३,१९,४४९संगमेश्वर२,१४,८१९१,९८,३४३लांजा१,१३,१५३१,०६,९८६राजापूर १,८४,६६६१,६५,८८२एकूण१६,९६,७७७ ६,१५,०६९२००१ सालच्या जनगणनेुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार पुरूषांमागे स्त्रियांची संख्या ११३६ इतकी होती. मात्र, २०११ साली स्त्रियांची संख्या ११२२ इतकी आहे. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १२१९, तर सर्वांत कमी रत्नागिरी तालुक्यात १०५३ इतकी आहे. २००१ साली झालेल्या जनगणनेवेळी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या १५,०४,५६८ इतकी होती, तर शहरी भागात १,९२,२०९ इतकी होती. २०११ साली हीच लोकसंख्या ग्रामीण १३,५१,३४६ इतकी झाली आहे, तर शहरी लोकसंख्या १६,५१०६९ इतकी आहे.