शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिलपासून धान्य गोदामातून न उचलण्याचा निर्णय

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

रास्तदर धान्य दुकानदार संघटना : दुकानापर्यंत माल पोहोच करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने आक्रमक

रत्नागिरी : शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २३ फेब्रुवारी २०१२ सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुधारित वितरण पध्दत तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अध्यादेश २०१३नुसार धान्य तालुका गोदामापासून रास्तभाव धान्य दुकानापर्यंत पोच करण्याचा निर्णय असताना त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत वेळोवेळी आंदोलने करूनसुध्दा शासन दुर्लक्ष करीत असल्याने १ एप्रिलपासून रत्नागिरी जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदारांनी गोदामातून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा संघटनेतर्फे गेली दोन वर्षे सातत्याने वाहतुकीच्या विषयासंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. संघटनेने जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांना २ मार्च १५ रोजी मोर्चा काढून निवेदन दिले होते. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यानंतर १८ मे २०१५ रोजी प्रधान सचिव यांच्यासमवेत मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. जुलै २०१५मध्ये अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट देवरूख येथे आले असता त्यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय न झाल्याने दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे.सन २००५पासून आतापर्यंत प्रतिक्विंटल २० किलोमीटरपर्यंत ९ रुपये ५६ पैसे, तर २० किलोमीटरच्या पुढे ११ रुपये २४ पैसे इतका दर दिला जात आहे. २० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिक्विंटल दर आकारला जावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. रास्तदर धान्य दुकानदार १ एप्रिलपासून वाहतूक रिबेट न कापता चलन भरणा करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रास्तदर धान्य दुकानदार तालुका गोडावून ते धान्य दुकानापर्यंतची वाहतूक न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यावेळी उपाध्यक्ष विकास चव्हाण, शशिकांत दळवी, सचिव नितीन कांबळे, सदस्य उल्हास प्रभूदेसाई, नुरूद्दिन सय्यद, योगेश शिंदे, अनंत केंद्रे, दिलीप राणे, संजय प्रभूदेसाई, प्रशांत पाटील, विजय राऊत, राजाभाऊ चाळके, पद्माकर कशाळकर, प्रकाश आग्रे, नाना बिर्जे उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रेशनकार्ड बायोमेट्रिकच्या कामासाठी सहकार्याचे आवाहन केले होते, शिवाय वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार संघटनेने बायोमेट्रिकच्या कामाला १०० टक्के सहकार्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील ९७२ रेशनदुकानदारांनी ९० टक्के काम अनुदाशिवाय पूर्ण केले असून, त्याचे अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांना धान्य तालुका गोदामापासून रास्तभाव धान्य दुकानापर्यंत पोच करण्यात येत आहे. उर्वरित १५ जिल्ह्यांबाबत शासन धान्य दुकानापर्यंत पोहोचविण्यासाठी पैसे आकारत आहे. शासन धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन, पुणेतर्फे ४ एप्रिल रोजी मुंबईतील विधानभवानावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.