शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

१ एप्रिलपासून धान्य गोदामातून न उचलण्याचा निर्णय

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

रास्तदर धान्य दुकानदार संघटना : दुकानापर्यंत माल पोहोच करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी नसल्याने आक्रमक

रत्नागिरी : शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या २३ फेब्रुवारी २०१२ सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुधारित वितरण पध्दत तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अध्यादेश २०१३नुसार धान्य तालुका गोदामापासून रास्तभाव धान्य दुकानापर्यंत पोच करण्याचा निर्णय असताना त्याप्रमाणे अंमलबजावणी केली जात नाही. याबाबत वेळोवेळी आंदोलने करूनसुध्दा शासन दुर्लक्ष करीत असल्याने १ एप्रिलपासून रत्नागिरी जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदारांनी गोदामातून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा संघटनेतर्फे गेली दोन वर्षे सातत्याने वाहतुकीच्या विषयासंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. परंतु शासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. संघटनेने जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांना २ मार्च १५ रोजी मोर्चा काढून निवेदन दिले होते. त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यानंतर १८ मे २०१५ रोजी प्रधान सचिव यांच्यासमवेत मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. जुलै २०१५मध्ये अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट देवरूख येथे आले असता त्यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली होती. त्यावेळी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत निर्णय न झाल्याने दुकानदारांमध्ये नाराजी पसरली आहे.सन २००५पासून आतापर्यंत प्रतिक्विंटल २० किलोमीटरपर्यंत ९ रुपये ५६ पैसे, तर २० किलोमीटरच्या पुढे ११ रुपये २४ पैसे इतका दर दिला जात आहे. २० किलोमीटरपर्यंत ४० रुपये प्रतिक्विंटल दर आकारला जावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. रास्तदर धान्य दुकानदार १ एप्रिलपासून वाहतूक रिबेट न कापता चलन भरणा करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व रास्तदर धान्य दुकानदार तालुका गोडावून ते धान्य दुकानापर्यंतची वाहतूक न करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यावेळी उपाध्यक्ष विकास चव्हाण, शशिकांत दळवी, सचिव नितीन कांबळे, सदस्य उल्हास प्रभूदेसाई, नुरूद्दिन सय्यद, योगेश शिंदे, अनंत केंद्रे, दिलीप राणे, संजय प्रभूदेसाई, प्रशांत पाटील, विजय राऊत, राजाभाऊ चाळके, पद्माकर कशाळकर, प्रकाश आग्रे, नाना बिर्जे उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांनी रेशनकार्ड बायोमेट्रिकच्या कामासाठी सहकार्याचे आवाहन केले होते, शिवाय वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार संघटनेने बायोमेट्रिकच्या कामाला १०० टक्के सहकार्याचे आश्वासन दिले. जिल्ह्यातील ९७२ रेशनदुकानदारांनी ९० टक्के काम अनुदाशिवाय पूर्ण केले असून, त्याचे अनुदान न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांना धान्य तालुका गोदामापासून रास्तभाव धान्य दुकानापर्यंत पोच करण्यात येत आहे. उर्वरित १५ जिल्ह्यांबाबत शासन धान्य दुकानापर्यंत पोहोचविण्यासाठी पैसे आकारत आहे. शासन धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशन, पुणेतर्फे ४ एप्रिल रोजी मुंबईतील विधानभवानावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.