शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

मरण झाले स्वस्त, महामारीत काेराेनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही वाहन चालक वेगाने गाडी चालवतात. यातून घडलेल्या अपघातांमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

लाॅकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. सध्या जिल्ह्यातील अपघातांची संख्या खूप कमी आहे. याला प्रमुख कारण लाॅकडाऊन आहे.

२०१८ मध्ये १३० अपघात झाले, २०० जखमी, मृत्यू २७, तर २०१९ मध्ये १११ अपघात १४४ जखमी, तर १६ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० मध्ये ६१ अपघात, जखमी ६२, तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये ३५ अपघात, ३३ जण जखमी व १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काेराेनानंतर जशी परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. तसे लाेकांनी गाडीच्या वेगाचे नियंत्रण वाढवायला सुरुवात केले आहे. वारंवार पोलीस प्रशासनाकडून सांगूनही लोक ऐकत नाहीत व अपघात होतात.

लाॅकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

- मुंबई-गोवा महामार्गावर किंवा ग्रामीण भागातील मार्गावर अपघात होतच असतात. रस्ते अपघातात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते.

- गेल्या वर्षी पहिल्या लाॅकडाऊनमध्ये अपघातांची संख्या खूपच तुरळक होती, परंतु जसेजसे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली, तसतशी अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

- ग्रामीण भागात मार्ग चांगला असल्यामुळे वाहने अतिशय जोरात चालविले जाते. काही ठिकाणी वळणांमुळे वाहने समोर आल्यामुळे दिसत नाहीत. वळणावर वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका अधिक असतो.

- रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गाव, वेरळ, वाकेड, आंजणारी घाट, पाली बाजारपेठ, लांजा बाजारपेठ या ठिकाणी वाहने हळूच चालवावी.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धाेका

चालत जाणाऱ्या व्यक्तीला धोका असतो, पण जिल्ह्यात आतापर्यंत पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी राहिले आहे. चालत जाणाऱ्या लोकांनीही काळजीपूर्वक वाहनांची गती बघून व दिशा बघूनच मार्ग बदलावा. चालत जाताना मोबाइलचा वापर टाळावा, जेणेकरून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे लक्ष राहिल.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

अपघात बहुतांशी वाहने वेगाने चालविण्यामुळे होतात. काही वेळा डोळ्यावर झोप आलेली असतानाही दूर पल्ल्याचा प्रवास केला जातो. तरुणाई अनेक धोक्यांना कवटाळत वाहन चालवत असते. त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात, त्यात तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य

कोणतेही काम कितीही महत्त्वाचे असेल, तरी वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पोहोचता येते. कुठेही जाताना वाहनाचा वेग वाढवून जाऊ नये. ‘लवकर निघा, सुरक्षित जावा’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा. गाडी चालविताना मनात कोणतेही विचार आणू नयेच, गाडी चालविताना एकाग्रता ठेवावी.

- प्रतीक काणेकर, राजापूर.

काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालवायची सवय असते. जेवढा वेगाने वाहन तुम्ही चालवाल, तेवढा धोका अपघातास असतो. त्यामुळे कुठेही जाताना वाहन हळूच चालवा. कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा गेले, तर चालेल, पण कधीच न जाणे योग्य ठरणार नाही.

- प्रथमेश भागवत, रत्नागिरी.