शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

मरण झाले स्वस्त, महामारीत काेराेनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही वाहन चालक वेगाने गाडी चालवतात. यातून घडलेल्या अपघातांमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

लाॅकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. सध्या जिल्ह्यातील अपघातांची संख्या खूप कमी आहे. याला प्रमुख कारण लाॅकडाऊन आहे.

२०१८ मध्ये १३० अपघात झाले, २०० जखमी, मृत्यू २७, तर २०१९ मध्ये १११ अपघात १४४ जखमी, तर १६ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० मध्ये ६१ अपघात, जखमी ६२, तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये ३५ अपघात, ३३ जण जखमी व १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काेराेनानंतर जशी परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. तसे लाेकांनी गाडीच्या वेगाचे नियंत्रण वाढवायला सुरुवात केले आहे. वारंवार पोलीस प्रशासनाकडून सांगूनही लोक ऐकत नाहीत व अपघात होतात.

लाॅकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

- मुंबई-गोवा महामार्गावर किंवा ग्रामीण भागातील मार्गावर अपघात होतच असतात. रस्ते अपघातात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते.

- गेल्या वर्षी पहिल्या लाॅकडाऊनमध्ये अपघातांची संख्या खूपच तुरळक होती, परंतु जसेजसे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली, तसतशी अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

- ग्रामीण भागात मार्ग चांगला असल्यामुळे वाहने अतिशय जोरात चालविले जाते. काही ठिकाणी वळणांमुळे वाहने समोर आल्यामुळे दिसत नाहीत. वळणावर वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका अधिक असतो.

- रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गाव, वेरळ, वाकेड, आंजणारी घाट, पाली बाजारपेठ, लांजा बाजारपेठ या ठिकाणी वाहने हळूच चालवावी.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धाेका

चालत जाणाऱ्या व्यक्तीला धोका असतो, पण जिल्ह्यात आतापर्यंत पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी राहिले आहे. चालत जाणाऱ्या लोकांनीही काळजीपूर्वक वाहनांची गती बघून व दिशा बघूनच मार्ग बदलावा. चालत जाताना मोबाइलचा वापर टाळावा, जेणेकरून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे लक्ष राहिल.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

अपघात बहुतांशी वाहने वेगाने चालविण्यामुळे होतात. काही वेळा डोळ्यावर झोप आलेली असतानाही दूर पल्ल्याचा प्रवास केला जातो. तरुणाई अनेक धोक्यांना कवटाळत वाहन चालवत असते. त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात, त्यात तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य

कोणतेही काम कितीही महत्त्वाचे असेल, तरी वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पोहोचता येते. कुठेही जाताना वाहनाचा वेग वाढवून जाऊ नये. ‘लवकर निघा, सुरक्षित जावा’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा. गाडी चालविताना मनात कोणतेही विचार आणू नयेच, गाडी चालविताना एकाग्रता ठेवावी.

- प्रतीक काणेकर, राजापूर.

काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालवायची सवय असते. जेवढा वेगाने वाहन तुम्ही चालवाल, तेवढा धोका अपघातास असतो. त्यामुळे कुठेही जाताना वाहन हळूच चालवा. कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा गेले, तर चालेल, पण कधीच न जाणे योग्य ठरणार नाही.

- प्रथमेश भागवत, रत्नागिरी.