शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मरण झाले स्वस्त, महामारीत काेराेनाने, नंतर रस्ते अपघातांमध्ये वाढले मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकठिकाणी ‘लवकर निघा सुरक्षित पोहाेचा ’ अशा सूचना लिहूनही काही वाहन चालक वेगाने गाडी चालवतात. यातून घडलेल्या अपघातांमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

लाॅकडाऊनमध्ये अपघातांचे प्रमाण व मृत्यूचे प्रमाण घटले होते. सध्या जिल्ह्यातील अपघातांची संख्या खूप कमी आहे. याला प्रमुख कारण लाॅकडाऊन आहे.

२०१८ मध्ये १३० अपघात झाले, २०० जखमी, मृत्यू २७, तर २०१९ मध्ये १११ अपघात १४४ जखमी, तर १६ लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० मध्ये ६१ अपघात, जखमी ६२, तर २१ जणांना जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये ३५ अपघात, ३३ जण जखमी व १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

काेराेनानंतर जशी परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. तसे लाेकांनी गाडीच्या वेगाचे नियंत्रण वाढवायला सुरुवात केले आहे. वारंवार पोलीस प्रशासनाकडून सांगूनही लोक ऐकत नाहीत व अपघात होतात.

लाॅकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

- मुंबई-गोवा महामार्गावर किंवा ग्रामीण भागातील मार्गावर अपघात होतच असतात. रस्ते अपघातात मृत्यू किंवा जखमींची संख्या अधिक असते.

- गेल्या वर्षी पहिल्या लाॅकडाऊनमध्ये अपघातांची संख्या खूपच तुरळक होती, परंतु जसेजसे पूर्वपदावर यायला सुरुवात झाली, तसतशी अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

या ठिकाणी वाहने हळू चालवा

- ग्रामीण भागात मार्ग चांगला असल्यामुळे वाहने अतिशय जोरात चालविले जाते. काही ठिकाणी वळणांमुळे वाहने समोर आल्यामुळे दिसत नाहीत. वळणावर वाहनावरील ताबा सुटण्याचा धोका अधिक असतो.

- रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गाव, वेरळ, वाकेड, आंजणारी घाट, पाली बाजारपेठ, लांजा बाजारपेठ या ठिकाणी वाहने हळूच चालवावी.

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धाेका

चालत जाणाऱ्या व्यक्तीला धोका असतो, पण जिल्ह्यात आतापर्यंत पादचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कमी राहिले आहे. चालत जाणाऱ्या लोकांनीही काळजीपूर्वक वाहनांची गती बघून व दिशा बघूनच मार्ग बदलावा. चालत जाताना मोबाइलचा वापर टाळावा, जेणेकरून रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांकडे लक्ष राहिल.

मृतांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

अपघात बहुतांशी वाहने वेगाने चालविण्यामुळे होतात. काही वेळा डोळ्यावर झोप आलेली असतानाही दूर पल्ल्याचा प्रवास केला जातो. तरुणाई अनेक धोक्यांना कवटाळत वाहन चालवत असते. त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात, त्यात तरुणांचा समावेश सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

वेळ माैल्यवान, पण जीवन अमूल्य

कोणतेही काम कितीही महत्त्वाचे असेल, तरी वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पोहोचता येते. कुठेही जाताना वाहनाचा वेग वाढवून जाऊ नये. ‘लवकर निघा, सुरक्षित जावा’ हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा. गाडी चालविताना मनात कोणतेही विचार आणू नयेच, गाडी चालविताना एकाग्रता ठेवावी.

- प्रतीक काणेकर, राजापूर.

काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालवायची सवय असते. जेवढा वेगाने वाहन तुम्ही चालवाल, तेवढा धोका अपघातास असतो. त्यामुळे कुठेही जाताना वाहन हळूच चालवा. कोणत्याही कार्यक्रमाला उशिरा गेले, तर चालेल, पण कधीच न जाणे योग्य ठरणार नाही.

- प्रथमेश भागवत, रत्नागिरी.