शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूने चिंता वाढली, आणखी २२ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी ...

रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. आराेग्य विभागाच्या अहवालानुसार आणखी २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, तर २५६ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून, दिवसभरात केवळ ११६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा आराेग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार शनिवारी दिवसभरात ४, तर मागील १८ रुग्णांचा काेराेनाने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील मृतांमध्ये राजापूर तालुक्यातील ७, रत्नागिरीतील ६, चिपळुणातील ४, संगमेश्वरमध्ये २ आणि खेड, गुहागर, लांजातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २०८३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात एकूण ६७,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्णांचा बरे होण्याचा दर ९३.८५ टक्के आहे. ३,६८२ आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५२ बाधित, तर २,३०० अँटिजन चाचण्यांमध्ये १०४ बाधित रुग्ण सापडले. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात २ रुग्ण, दापोलीत १७, खेडमध्ये २७, गुहागरात २४, चिपळुणात ५३, संगमेश्वरात ७, रत्नागिरीत ९०, लांजात २१ आणि राजापुरातील १५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण २,०७४ रुग्ण उपचार घेत असून, त्यामध्ये १,६५६ लक्षणे नसलेले रुग्ण, तर ४१८ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. १९७ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून, ७२ अतिदक्षता विभागात आहेत.

-----------------

अजून मागील मृत्यू किती?

जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शुक्रवारी २८ रुग्ण दाखविण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी आराेग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये १८ रुग्णांचा मृत्यू मागील दिवसांमध्ये झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मागील दिवसांत आणखी किती जणांचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.