शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

महावितरण : ८0 शाळांचा पुरवठा खंडित

रत्नागिरी : शाळांचे वीजबील भरण्यासाठी शासकीय निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ८० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकीकडे शासन ‘ई’ लर्निंग प्रणालीची अमंलबजावणी करीत असताना दुसरीकडे मात्र विजेअभावी शाळेतील संगणक शोभेचे बाहुले बनले आहेत. ज्या ठिकाणी शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमय केले जाते, त्या शाळांमध्ये महावितरणच्या विजेने मात्र अंधार केला आहे. शासनाच्या चार टक्के सादील योजनेतंर्गत शाळांना निधी दिला जातो. त्यातून वीजबिल, पाणी बिल भरणे अशक्य होत आहे. पूर्वी शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शाळांना ३.३६ रूपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता शाळांना वाणिज्यिक दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शाळांना प्रति युनिट ५.३८ पैसे दराने विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे वाढीव वीज बील भरणे शाळांना अशक्य झाले आहे. दैनंदिन शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी सर्व शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. शिवाय ई लर्निंगचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा असून ८० शाळांचा वीजपुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी आणलेले संगणक शोभेच्या बाहुल्याप्रमाणे कोपऱ्यात धूळ खात पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून ई-लर्निग उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र विजेअभावी हा उपक्रमापासून ८० शाळा वंचित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता कल आहे. शासन या शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. असे असताना विजेचा प्रश्नदेखील शाळांपुढे उभा ठाकला आहे. यावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.(प्रतिनिधी)