शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

ज्ञानाच्या मंदिरात विजेचा अंधार

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

महावितरण : ८0 शाळांचा पुरवठा खंडित

रत्नागिरी : शाळांचे वीजबील भरण्यासाठी शासकीय निधीची तरतूद नसल्यामुळे जिल्ह्यातील ८० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकीकडे शासन ‘ई’ लर्निंग प्रणालीची अमंलबजावणी करीत असताना दुसरीकडे मात्र विजेअभावी शाळेतील संगणक शोभेचे बाहुले बनले आहेत. ज्या ठिकाणी शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांचे आयुष्य प्रकाशमय केले जाते, त्या शाळांमध्ये महावितरणच्या विजेने मात्र अंधार केला आहे. शासनाच्या चार टक्के सादील योजनेतंर्गत शाळांना निधी दिला जातो. त्यातून वीजबिल, पाणी बिल भरणे अशक्य होत आहे. पूर्वी शाळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शाळांना ३.३६ रूपये प्रतियुनिट दराने वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र आता शाळांना वाणिज्यिक दराने वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शाळांना प्रति युनिट ५.३८ पैसे दराने विजेचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे वाढीव वीज बील भरणे शाळांना अशक्य झाले आहे. दैनंदिन शालेय जीवनापासून संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी सर्व शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. शिवाय ई लर्निंगचे धडेही विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. जिल्ह्यात २७४६ प्राथमिक शाळा असून ८० शाळांचा वीजपुरवठा बील न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान देण्यासाठी आणलेले संगणक शोभेच्या बाहुल्याप्रमाणे कोपऱ्यात धूळ खात पडले आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून ई-लर्निग उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र विजेअभावी हा उपक्रमापासून ८० शाळा वंचित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती सुरू आहे. पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता कल आहे. शासन या शाळांतील विद्यार्थी गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. असे असताना विजेचा प्रश्नदेखील शाळांपुढे उभा ठाकला आहे. यावर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन योग्य तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.(प्रतिनिधी)