शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला ...

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मधलीवाडी व चाचेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भूसुरुंगांमुळे घरांना तडे जात असल्याने सद्यपरिस्थितीत पुन्हा घर बांधणे किंवा दुरुस्त करण्याइतकी येथील शेतकऱ्यांची परिस्थिती नाही. क्रशरकरिता भूसुरुंग लावले जातात, त्या जागेलगत वाडीतील ग्रामस्थांच्या जागा आहेत. मात्र, शासन स्तरावर आम्हा लगतदारांची हरकत कोणीही विचारात घेत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आमच्या जमिनीत काजू व जनावरांचा चारा असून, पाचशे मीटरच्या आत काजू लागवड नाही, असा चुकीचा उल्लेख पंचयादीत केलेला आहे तसेच उलटाचा पऱ्या हा या क्रशर व भूसुरुंगाच्या ठिकाणी उगम पावत असल्याने या क्रशरजवळील माती, लहान-मोठी खडी पऱ्यात वाहून येते. त्यामुळे मासे मरतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

भूसुरुंगामुळे येथील विहीर व बोअरवेलचे पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मुरादपूर वरचीवाडीतील लोकांना या क्रशरचा धोका नाही. तेथील काही लोक पंचयादी, जबाबदार व लगत जमीन म्हणून नावे देतात तसेच सह्या करतात. परंतु, त्यांना कोणताही धोका नाही, अशा लोकांमुळे आम्हा कुटुंबांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. हा क्रशर होण्यापूर्वी म्हणजे २०१५ सालात भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात दोन्ही वाडीतील लोकांनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर काही काळ क्रशर बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने २०१७ला ना हरकत दाखला दिला. त्यानंतर क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेत १८ एप्रिल २०१८ रोजी ठराव संमत करण्यात आला व तालुक्‍याच्या आमसभेतदेखील क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.

तसेच २०१८पासून पत्रव्यवहार करूनही २०२० साली अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीमुळे एक क्रशर मालक व्यवसाय करत आहेत. भूसुरुंगाने भूस्खलन झाल्यास डोंगराच्या पायथ्याशी असणारी कुटुंब गाडली जातील, याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील बावनदीला महापूर येतो, तेव्हा येथील काही घरांच्या जवळ पाणी येते. पूर्व-पश्चिम-दक्षिण या तिन्ही दिशेला पाणीच पाणी असते. उत्तरेला डोंगराळ भाग असल्याने भूसुरुंगाच्या हादऱ्याने डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यास डोंगर व नदी यांच्यामध्ये मधलीवाडी व चाचेवाडीतील घरे असून, येथील डोंगर घरांवर येऊ शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.