शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला ...

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मधलीवाडी व चाचेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भूसुरुंगांमुळे घरांना तडे जात असल्याने सद्यपरिस्थितीत पुन्हा घर बांधणे किंवा दुरुस्त करण्याइतकी येथील शेतकऱ्यांची परिस्थिती नाही. क्रशरकरिता भूसुरुंग लावले जातात, त्या जागेलगत वाडीतील ग्रामस्थांच्या जागा आहेत. मात्र, शासन स्तरावर आम्हा लगतदारांची हरकत कोणीही विचारात घेत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आमच्या जमिनीत काजू व जनावरांचा चारा असून, पाचशे मीटरच्या आत काजू लागवड नाही, असा चुकीचा उल्लेख पंचयादीत केलेला आहे तसेच उलटाचा पऱ्या हा या क्रशर व भूसुरुंगाच्या ठिकाणी उगम पावत असल्याने या क्रशरजवळील माती, लहान-मोठी खडी पऱ्यात वाहून येते. त्यामुळे मासे मरतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

भूसुरुंगामुळे येथील विहीर व बोअरवेलचे पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मुरादपूर वरचीवाडीतील लोकांना या क्रशरचा धोका नाही. तेथील काही लोक पंचयादी, जबाबदार व लगत जमीन म्हणून नावे देतात तसेच सह्या करतात. परंतु, त्यांना कोणताही धोका नाही, अशा लोकांमुळे आम्हा कुटुंबांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. हा क्रशर होण्यापूर्वी म्हणजे २०१५ सालात भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात दोन्ही वाडीतील लोकांनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर काही काळ क्रशर बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने २०१७ला ना हरकत दाखला दिला. त्यानंतर क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेत १८ एप्रिल २०१८ रोजी ठराव संमत करण्यात आला व तालुक्‍याच्या आमसभेतदेखील क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.

तसेच २०१८पासून पत्रव्यवहार करूनही २०२० साली अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीमुळे एक क्रशर मालक व्यवसाय करत आहेत. भूसुरुंगाने भूस्खलन झाल्यास डोंगराच्या पायथ्याशी असणारी कुटुंब गाडली जातील, याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील बावनदीला महापूर येतो, तेव्हा येथील काही घरांच्या जवळ पाणी येते. पूर्व-पश्चिम-दक्षिण या तिन्ही दिशेला पाणीच पाणी असते. उत्तरेला डोंगराळ भाग असल्याने भूसुरुंगाच्या हादऱ्याने डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यास डोंगर व नदी यांच्यामध्ये मधलीवाडी व चाचेवाडीतील घरे असून, येथील डोंगर घरांवर येऊ शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.