शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

क्रशरसाठी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला ...

देवरुख : संगमेश्‍वर तालुक्‍यातील मुरादपूर पातीची मधलीवाडी येथील डोंगरात क्रशरसाठी सुरुंग लावण्यात येत असल्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे क्रशरला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी मधलीवाडी व चाचेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे निवेदन संगमेश्वर तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहे. या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दि. १५ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भूसुरुंगांमुळे घरांना तडे जात असल्याने सद्यपरिस्थितीत पुन्हा घर बांधणे किंवा दुरुस्त करण्याइतकी येथील शेतकऱ्यांची परिस्थिती नाही. क्रशरकरिता भूसुरुंग लावले जातात, त्या जागेलगत वाडीतील ग्रामस्थांच्या जागा आहेत. मात्र, शासन स्तरावर आम्हा लगतदारांची हरकत कोणीही विचारात घेत नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. आमच्या जमिनीत काजू व जनावरांचा चारा असून, पाचशे मीटरच्या आत काजू लागवड नाही, असा चुकीचा उल्लेख पंचयादीत केलेला आहे तसेच उलटाचा पऱ्या हा या क्रशर व भूसुरुंगाच्या ठिकाणी उगम पावत असल्याने या क्रशरजवळील माती, लहान-मोठी खडी पऱ्यात वाहून येते. त्यामुळे मासे मरतात, असेही निवेदनात म्हटले आहे.

भूसुरुंगामुळे येथील विहीर व बोअरवेलचे पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मुरादपूर वरचीवाडीतील लोकांना या क्रशरचा धोका नाही. तेथील काही लोक पंचयादी, जबाबदार व लगत जमीन म्हणून नावे देतात तसेच सह्या करतात. परंतु, त्यांना कोणताही धोका नाही, अशा लोकांमुळे आम्हा कुटुंबांना मानसिक व आर्थिक त्रास होत आहे. हा क्रशर होण्यापूर्वी म्हणजे २०१५ सालात भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात दोन्ही वाडीतील लोकांनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर काही काळ क्रशर बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर ग्रामपंचायतीने २०१७ला ना हरकत दाखला दिला. त्यानंतर क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ग्रामसभेत १८ एप्रिल २०१८ रोजी ठराव संमत करण्यात आला व तालुक्‍याच्या आमसभेतदेखील क्रशर व भूसुरुंग बंद करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.

तसेच २०१८पासून पत्रव्यवहार करूनही २०२० साली अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवानगीमुळे एक क्रशर मालक व्यवसाय करत आहेत. भूसुरुंगाने भूस्खलन झाल्यास डोंगराच्या पायथ्याशी असणारी कुटुंब गाडली जातील, याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील बावनदीला महापूर येतो, तेव्हा येथील काही घरांच्या जवळ पाणी येते. पूर्व-पश्चिम-दक्षिण या तिन्ही दिशेला पाणीच पाणी असते. उत्तरेला डोंगराळ भाग असल्याने भूसुरुंगाच्या हादऱ्याने डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यास डोंगर व नदी यांच्यामध्ये मधलीवाडी व चाचेवाडीतील घरे असून, येथील डोंगर घरांवर येऊ शकतो. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते, असे या निवेदनात म्हटले आहे.