शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या ...

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या दाेन दिवसात तब्बल ४४७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाने दिली आहे. या अतिवृष्टीत शहर व जालगाव परिसरात जवळपास कोटींचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे नुकसान होऊन ५१,७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोठ्याचे २१,५०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. दापोली शहरातील व जालगाव गावातील सात दुकानांचे ४ लाख ४४ हजार रुपयांचे तर जालगाव व शहरातील ९६ नागरिकांच्या घरातील भांडी व इतर साहित्याचे जवळपास ६४ लाख ७४ हजार तर, ४५ गाड्यांचे नुकसान होऊन ३४ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तसेच सारंग या ठिकाणी रस्ता खचला होता. दापोली शहरालगत व जालगाव गावात खलाटी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. हा भाग खोलगट असल्यामुळे पाणी भरपूर पाऊस पडल्यावर भरते, मात्र ही परिस्थिती कमी असते.

---------------

दापोली शहरातील जोग नदीला पूर येतोच, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आले होते त्यामुळे घडली होती. परंतु, त्यानंतर अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. याचे कारण म्हणजे शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने पाणी आले आहे.

- संदीप केळस्कर, शहराध्यक्ष, भाजप

-------------------------

महसूलच्या अधिकाऱ्यांची जालगावला भेट

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पावसातच आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली हाेती. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनीही आपत्तीग्रस्त भागाला समक्ष भेट देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम इदाते, सदस्य यांच्यासह कर्मचारी यांनी या भागात मदत कार्य केले.

---------------------

शेतीच्या नुकसानाची चाचपणी

दापोलीत झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. नदी किनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, अद्याप या नुकसानाची आकडेवारी अजूनही समाेर आलेली नाही. मात्र, कृषी विभागाकडून गावोगावी चाचपणी सुरु असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्याचबरोबर शेतीचे, झाडांचे फार नुकसान झालेले नसल्याचा अंदाज देखील कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.