शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या ...

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या दाेन दिवसात तब्बल ४४७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाने दिली आहे. या अतिवृष्टीत शहर व जालगाव परिसरात जवळपास कोटींचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे नुकसान होऊन ५१,७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोठ्याचे २१,५०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. दापोली शहरातील व जालगाव गावातील सात दुकानांचे ४ लाख ४४ हजार रुपयांचे तर जालगाव व शहरातील ९६ नागरिकांच्या घरातील भांडी व इतर साहित्याचे जवळपास ६४ लाख ७४ हजार तर, ४५ गाड्यांचे नुकसान होऊन ३४ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तसेच सारंग या ठिकाणी रस्ता खचला होता. दापोली शहरालगत व जालगाव गावात खलाटी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. हा भाग खोलगट असल्यामुळे पाणी भरपूर पाऊस पडल्यावर भरते, मात्र ही परिस्थिती कमी असते.

---------------

दापोली शहरातील जोग नदीला पूर येतोच, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आले होते त्यामुळे घडली होती. परंतु, त्यानंतर अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. याचे कारण म्हणजे शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने पाणी आले आहे.

- संदीप केळस्कर, शहराध्यक्ष, भाजप

-------------------------

महसूलच्या अधिकाऱ्यांची जालगावला भेट

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पावसातच आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली हाेती. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनीही आपत्तीग्रस्त भागाला समक्ष भेट देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम इदाते, सदस्य यांच्यासह कर्मचारी यांनी या भागात मदत कार्य केले.

---------------------

शेतीच्या नुकसानाची चाचपणी

दापोलीत झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. नदी किनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, अद्याप या नुकसानाची आकडेवारी अजूनही समाेर आलेली नाही. मात्र, कृषी विभागाकडून गावोगावी चाचपणी सुरु असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्याचबरोबर शेतीचे, झाडांचे फार नुकसान झालेले नसल्याचा अंदाज देखील कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.