शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अतिवृष्टीत दापोली तालुक्याचे कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:33 IST

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या ...

दापोली : दापोली तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या ढगफुटीमुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. या दाेन दिवसात तब्बल ४४७ मिलीमीटर पावसाची नाेंद झाल्याची माहिती डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाने दिली आहे. या अतिवृष्टीत शहर व जालगाव परिसरात जवळपास कोटींचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील कळंबट येथील दोन घरांचे नुकसान होऊन ५१,७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गोठ्याचे २१,५०० रुपयांचे नुकसान झालेले आहे. दापोली शहरातील व जालगाव गावातील सात दुकानांचे ४ लाख ४४ हजार रुपयांचे तर जालगाव व शहरातील ९६ नागरिकांच्या घरातील भांडी व इतर साहित्याचे जवळपास ६४ लाख ७४ हजार तर, ४५ गाड्यांचे नुकसान होऊन ३४ लाख ६६ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर लाडघर मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. तसेच सारंग या ठिकाणी रस्ता खचला होता. दापोली शहरालगत व जालगाव गावात खलाटी भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरून ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. हा भाग खोलगट असल्यामुळे पाणी भरपूर पाऊस पडल्यावर भरते, मात्र ही परिस्थिती कमी असते.

---------------

दापोली शहरातील जोग नदीला पूर येतोच, पण पाणी रस्त्यावर येत नाही. अशी घटना फार वर्षांपूर्वी नाल्याजवळ लाकडाचे ओंडके आले होते त्यामुळे घडली होती. परंतु, त्यानंतर अशी परिस्थिती प्रथमच आली आहे. याचे कारण म्हणजे शिवस्मारक येथील नाला साफ न केल्याने पाणी आले आहे.

- संदीप केळस्कर, शहराध्यक्ष, भाजप

-------------------------

महसूलच्या अधिकाऱ्यांची जालगावला भेट

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पावसातच आपत्तीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली हाेती. दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनीही आपत्तीग्रस्त भागाला समक्ष भेट देऊन पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ग्रुप ग्रामपंचायत जालगावच्या सरपंच श्रुती गोलांबडे, उपसरपंच विकास लिंगावले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम इदाते, सदस्य यांच्यासह कर्मचारी यांनी या भागात मदत कार्य केले.

---------------------

शेतीच्या नुकसानाची चाचपणी

दापोलीत झालेल्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे शेतीचे अधिक नुकसान झाले आहे. नदी किनारी असलेल्या शेतीचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, अद्याप या नुकसानाची आकडेवारी अजूनही समाेर आलेली नाही. मात्र, कृषी विभागाकडून गावोगावी चाचपणी सुरु असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले. त्याचबरोबर शेतीचे, झाडांचे फार नुकसान झालेले नसल्याचा अंदाज देखील कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे.