शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खेडमधील धरण १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० टक्के भरली आहेत. धरणे १०० टक्के भरून वाहू लागल्याने यावर्षी तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई काहीअंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात नातूवाडी, शेलारवाडी, कोंडिवली, शिरवली, तळवट, खोपी, पोयनार, न्यू मांडवे ही धरणे आहेत. या धरणांपैकी पोयनार आणि न्यू मांडवे ही धरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. अन्य धरणांमध्ये पाणीसाठा केला जातो. परंतु, नातूवाडी आणि शिरवली ही दोन धरण वगळता अन्य कोणत्याही धरणांचे पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. कालव्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने या धरणांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना दुबार शेती करता येत नाही. मात्र, धरणात मुबलक पाणी साठा असल्याने टंचाईच्या काळात धरणातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागवणे शक्य होते.

खेड तालुक्यातील चोरटी नदीवर बांधण्यात आलेले नातूवाडी हे धरण तालुक्यातील अनेक गावांसाठी संजीवनी ठरत आले आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकरी दुबार पिके घेऊ लागली आहेत, तर धरणातील पाण्यावर अनेक नळपाणी योजनाही सुरू आहेत. आगामी काळात खेड शहरालाही याच धरणातील पाणी गुरुत्वबलाने पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

तालुक्यातील शिरवली धरणातही मुबलक पाणी साठा आहे. या धरणातील पाण्यावर काही गावांमध्ये दुबार पिके घेतली जातात, काही ग्रामस्थांनी भाजीपाल्याच्या बागाही फुलविल्या आहेत. मात्र, शेलारवाडी, तळवट, खोपी, कोंडिवली, या धरणांच्या कालव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही यातील एकही थेंब सिंचनासाठी वापरला जात नाही.

-----------------------

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात यंदा १ जून ते २४ सप्टेंबर दरम्यान ४२२९.८० मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी याच मुदतीत ४०२३.५० इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे.

-------------------

पाेयनार, न्यू मांडवे धरणांची कामे अर्धवट

पोयनार आणि न्यू मांडवे या धरणांची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणीसाठा सुरू झाला असता. त्यामुळे अन्य काही गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघाला असता. तसेच काही गावातील शेतकऱ्यांना दुबार शेतीही करण्यात आली असती. मात्र, या दोन धरणांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने धरणांसाठी आतापर्यंत केलेला खर्च आजतरी पाण्यात गेल्यासारखा आहे.