शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

खेडमधील धरण १०० टक्के भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० टक्के भरली आहेत. धरणे १०० टक्के भरून वाहू लागल्याने यावर्षी तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई काहीअंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तालुक्यात नातूवाडी, शेलारवाडी, कोंडिवली, शिरवली, तळवट, खोपी, पोयनार, न्यू मांडवे ही धरणे आहेत. या धरणांपैकी पोयनार आणि न्यू मांडवे ही धरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. अन्य धरणांमध्ये पाणीसाठा केला जातो. परंतु, नातूवाडी आणि शिरवली ही दोन धरण वगळता अन्य कोणत्याही धरणांचे पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. कालव्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने या धरणांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना दुबार शेती करता येत नाही. मात्र, धरणात मुबलक पाणी साठा असल्याने टंचाईच्या काळात धरणातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागवणे शक्य होते.

खेड तालुक्यातील चोरटी नदीवर बांधण्यात आलेले नातूवाडी हे धरण तालुक्यातील अनेक गावांसाठी संजीवनी ठरत आले आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकरी दुबार पिके घेऊ लागली आहेत, तर धरणातील पाण्यावर अनेक नळपाणी योजनाही सुरू आहेत. आगामी काळात खेड शहरालाही याच धरणातील पाणी गुरुत्वबलाने पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

तालुक्यातील शिरवली धरणातही मुबलक पाणी साठा आहे. या धरणातील पाण्यावर काही गावांमध्ये दुबार पिके घेतली जातात, काही ग्रामस्थांनी भाजीपाल्याच्या बागाही फुलविल्या आहेत. मात्र, शेलारवाडी, तळवट, खोपी, कोंडिवली, या धरणांच्या कालव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही यातील एकही थेंब सिंचनासाठी वापरला जात नाही.

-----------------------

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात यंदा १ जून ते २४ सप्टेंबर दरम्यान ४२२९.८० मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी याच मुदतीत ४०२३.५० इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे.

-------------------

पाेयनार, न्यू मांडवे धरणांची कामे अर्धवट

पोयनार आणि न्यू मांडवे या धरणांची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणीसाठा सुरू झाला असता. त्यामुळे अन्य काही गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघाला असता. तसेच काही गावातील शेतकऱ्यांना दुबार शेतीही करण्यात आली असती. मात्र, या दोन धरणांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने धरणांसाठी आतापर्यंत केलेला खर्च आजतरी पाण्यात गेल्यासारखा आहे.