शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मिसळीतून कांदा गायब, कांदाभजीचा पत्ता कट

By admin | Updated: July 9, 2014 23:45 IST

पुन्हा कांदा संकट : व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी...

रत्नागिरी : कांद्याचे दर वधारले आहेत. सध्या ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा विक्री सुरू आहे. भविष्यात दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिसळीतील कांदा गायब झाला आहे, तर टपऱ्यांवरील कांदाभजीचा पत्ताच कट झाला आहे.कांदा वधारल्यामुळे उपाहारगृह व टपरी व्यावसायिकांना कांदा सढळ हस्ते देणे परवडत नाही. कांदा भविष्यात वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी कांद्याने १०० रूपये किलोपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर ते खाली आले होते. सहा ते सात रूपये दराने कांद्याची विक्री सुरू होती. परंतु पावसाअभावी कांद्याचे दर वधारले तसेच ते आणखी वधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उपाहारगृह चालकांनी मिसळीतून कांदा देणे बंद केले आहे. काही उपाहारगृहांतून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो. परंतु कांदाभजी मात्र बंद करण्यात आली आहे. कांदा ७ ते ८ रूपये किलो दराने विकण्यात येत होता. त्यावेळी कांदाभजी १५ रूपयांना ५ नग देण्यात येत होते. मात्र, ३० ते ३५ रूपये दर असल्याने दर वाढविला तर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा नसल्यामुळे कांदाभजी काढणे बंद करण्यात आली आहे.मूग किंवा वाटाण्याच्या गरमागरम रशात सढळ हस्ते कांदा, फरसाण, कोथिंबीर, कांदेपोहे, शेव घातली जाते. वरून पुन्हा एकदा कडकडीत रस्सा ओतला जातो. कांद्याचा दर वाढल्याने सढळ हस्ते कांदा देणे परवडत नाही. त्यामुळे बहुतांश उपाहारगृहातून मिसळीत थोडासा कांदा दिला जातो, तर टपरी व्यावसायिकांनी तो देणेच बंद केले आहे. शिवाय पुन्हा कुठल्या ग्राहकांनी कांदा मागविला तर त्यांना चक्क नकार दिला जातो. बहुतांश हॉटेल्समध्ये कांद्याऐवजी चिरलेला कोबी दिला जातो.टपरीवर येणारा ग्राहक सर्वसाधारण गटातील असतो. त्यामुळे कांदाभजीचे दर वाढविणे परवडणारे नाही. त्यामुळे कांदाभजी तयार करणे बंद करण्यात आले आहे. शिवाय पावसाळ्यात घरोघरी भजीचा सुगंध दरवळतो. मात्र, यावर्षी महागाईमुळे कांद्याऐवजी चक्क कोबीची भजी करून पानात वाढून घेतली जात आहे.यावर्षी कांदा, बटाट्याचे दर वाढले आहेत. अजून दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे साठा केलेला कांदा जपून वापरण्यात येत आहे. कांदाभजी प्लेटमध्ये १५ रूपयास ५ नग देणे परवडत नाही. प्लेटचे दर वाढविले तर मात्र ते ग्राहकांस परवडणारे नाहीत. त्यामुळे एकूण अंदाज घेत कांदाभजीची विक्री बंद करण्यात आली आहे. मिसळीत नावाला कांदा घालण्यात येत आहे. बटाटाभजी, बटाटावडा, मिक्स भजी, मिरची भजी सध्या विक्रीस उपलब्ध आहेत.- के.एस. कांबळे, व्यावसायिक, रत्नागिरी (प्रतिनिधी)