शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:33 IST

राजापूर : राजापूर शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार होत असून वाढीव दराने मालाची विक्री ...

राजापूर : राजापूर शहरात दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार होत असून वाढीव दराने मालाची विक्री केली जात असल्याचा आराेप नागरिक सदाशिव बापू तांबडे यांनी केला आहे. या प्रकाराबाबत त्यांनी सहकाऱ्यांसह आठवडा बाजारात जाऊन संबंधित व्यापाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

राजापुरात दर गुरुवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. तसेच कृषीसह किराणा मालही उपलब्ध असतो. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव बाजारात घसरले असतानाच राजापूरच्या आठवडा बाजारात आलेले व्यापारी कमी प्रतीचा कांदा ३० रुपये प्रती किलो भावाने विक्री करतात.

दरम्यान, स्थानिक नागरिक सदाशिव बापू तांबडे हे आपल्या काही सहकाऱ्यांसह आठवडा बाजारात गेले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. सदाशिव तांबडे यांनी संबंधित व्यापाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्यानंतर कांदाचा दर वीस रुपये प्रती किलो करण्यात आल्याचे तांबडे यांनी सांगितले. येत्या गुरुवारी आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची नगरपरिषदेने चाैकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

चाैकट

फळांवर केमिकल्सचा वापर

आठवडा बाजारात विविध प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यावर केमिकल्सचा वापर केला जातो. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक असतानाच स्थानिक नगरपरिषदेचे आरोग्य प्रशासन मात्र त्याकडे सपशेल कानाडोळा करत असल्याचे तांबडे यांनी म्हटले आहे. नागरिकांची हाेणारी लयलूट थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे.