शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

कासईत दरडीचा धोका

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

टांगती तलवार : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत

खेड : खेडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या कासईला अद्याप दरडींचा धोका कायमच आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कासई बोरवाडी रस्ता पूर्णपणे बंद पडल्याने वाहतूक बंद पडली आहे़ या मार्गावरील एस. टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित अभियंता एस. के. पाटील यांना कळवल्यानंतरही ही दरड हटविण्यात न आल्याने या मार्गावरील १२ गावांचे मोठे नुकसान झाले आहे. अभियंत्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़कासई गावातील घाटमाथ्यावर असलेल्या बोरवाडी येथील ६ जणांच्या घरावर ही दरड कोसळली आहे. गोविंद गणपत गोवळकर, बाळकृष्ण शंकर हरेकर, दीपक सखाराम सावंत, धोंडू कंचावडे, अशोेक शिंंदे यांच्या घरांवर ही अजस्त्र दरड कोसळली आहे. या घटनेला ५ दिवस झाले़ त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या घरात जात असून, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे़ मात्र, अद्याप या दरडीची पाहणी करण्यासाठी किंवा नुकसान भरपाई देण्यासाठी अभियंता पाटील घटनास्थळी पोहोचले नाहीत़ महसूल यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. रघुवीर घाट आणि धामणंद विभागातील १६ गावांचा दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा मार्ग म्हणून खेड खोपी ते कासई-धामणंद मार्ग हा पूर्णत: निकृष्ट झाला आहे. कासई येथील ६ घरांवर दरड कोसळल्याने हा मार्ग आता पूर्ण बंद पडला आहे़ त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे आणि व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. हा मार्ग तातडीने खुला न झाल्यास अभियंता पाटील तसेच महसूल यंत्रणेविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत ग्रामस्थांना पावले उचलावी लागतील, असा इशारा रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. या भागात धोकादायक दरडींचा अहवाल तयार करण्यात आला होता काय? असला तर त्याच्यावरील कृती कार्यक्रम का झाला नाही, असा सवाल उतेकर यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)रघुवीर घाटातील दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असतानाच कासई येथे दरडी कोसळल्या. त्यावेळेपासून कासईच्या आसपासची १९ गावे दळणवळणापासून वंचित राहिली आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असताना आता यावर उपाययोजना कडक व्हावी, अशी मागणी रमेश उतेकर यांनी केली आहे. धोकादायक दरडी कोसळण्याच्या प्रकारानंतर याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. ही बाब संबंधित विभागाने गांभिर्याने घ्यावी, असा आग्रह धरला आहे.