शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

कासईत दरडीचा धोका

By admin | Updated: June 29, 2015 00:28 IST

टांगती तलवार : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत

खेड : खेडपासून ४० किलोमीटरवर असलेल्या कासईला अद्याप दरडींचा धोका कायमच आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने कासई बोरवाडी रस्ता पूर्णपणे बंद पडल्याने वाहतूक बंद पडली आहे़ या मार्गावरील एस. टी. वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित अभियंता एस. के. पाटील यांना कळवल्यानंतरही ही दरड हटविण्यात न आल्याने या मार्गावरील १२ गावांचे मोठे नुकसान झाले आहे. अभियंत्यांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे़कासई गावातील घाटमाथ्यावर असलेल्या बोरवाडी येथील ६ जणांच्या घरावर ही दरड कोसळली आहे. गोविंद गणपत गोवळकर, बाळकृष्ण शंकर हरेकर, दीपक सखाराम सावंत, धोंडू कंचावडे, अशोेक शिंंदे यांच्या घरांवर ही अजस्त्र दरड कोसळली आहे. या घटनेला ५ दिवस झाले़ त्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या घरात जात असून, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे़ मात्र, अद्याप या दरडीची पाहणी करण्यासाठी किंवा नुकसान भरपाई देण्यासाठी अभियंता पाटील घटनास्थळी पोहोचले नाहीत़ महसूल यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. रघुवीर घाट आणि धामणंद विभागातील १६ गावांचा दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा मार्ग म्हणून खेड खोपी ते कासई-धामणंद मार्ग हा पूर्णत: निकृष्ट झाला आहे. कासई येथील ६ घरांवर दरड कोसळल्याने हा मार्ग आता पूर्ण बंद पडला आहे़ त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांचे, विद्यार्थ्यांचे आणि व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. हा मार्ग तातडीने खुला न झाल्यास अभियंता पाटील तसेच महसूल यंत्रणेविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत ग्रामस्थांना पावले उचलावी लागतील, असा इशारा रमेश उतेकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. या भागात धोकादायक दरडींचा अहवाल तयार करण्यात आला होता काय? असला तर त्याच्यावरील कृती कार्यक्रम का झाला नाही, असा सवाल उतेकर यांनी विचारला आहे. (प्रतिनिधी)रघुवीर घाटातील दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असतानाच कासई येथे दरडी कोसळल्या. त्यावेळेपासून कासईच्या आसपासची १९ गावे दळणवळणापासून वंचित राहिली आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या असताना आता यावर उपाययोजना कडक व्हावी, अशी मागणी रमेश उतेकर यांनी केली आहे. धोकादायक दरडी कोसळण्याच्या प्रकारानंतर याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. ही बाब संबंधित विभागाने गांभिर्याने घ्यावी, असा आग्रह धरला आहे.