शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

केंद्र सरकारवरील दबावासाठी पतसंस्थांचे दिल्लीत अधिवेशन

By मनोज मुळ्ये | Updated: November 2, 2023 19:15 IST

सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांची माहिती

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात देशातील पतसंस्थांचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचवेळी काही समस्याही प्राधान्याने पुढे येत आहेत. त्यातील काही समस्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने सहकारी भारतीच्या माध्यमातून देशातील पतसंस्था प्रतिनिधींचे एक अधिवेशन २ व ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी दिली.

या अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी डॉ. जोशी गुरुवारी रत्नागिरी आले होते. त्यांनी जिल्ह्यातील पतसंस्था प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्यानंतर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेत झालेल्या पतसंस्थेत त्यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. या अधिवेशनाला देशातील पतसंस्थांचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित असतील. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा या अधिवेशनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

२८ प्रदेशातील ६५० जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे काम पोहोचले आहे. सहकारातील वेगवेगळ्या क्षेत्रांची राष्ट्रीय अधिवेशने २ ऑक्टोबरपासून घेतली जात आहेत. दोन अधिवेशने झाली आहेत. आता क्रेडीट सोसायट्यांचे अधिवेशन दिल्लीमध्ये घेतले जाणार आहे. देशात १ लाख १० हजार पतसंस्था आहेत. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र अशा पतसंस्थांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी पडून आहेत. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण असावे, यासाठी एखादे महामंडळ किंवा संस्था असावी, आयकराबाबतचे काही प्रश्न अजून बाकी आहेत, २० हजार रुपयांच्यावर रोखीने व्यवहार झाल्यास त्यासाठी दंड भरावा लागतो, गुंतवणुकीवरील व्याजावर कर आकारला जातो, त्याबाबत निर्णय व्हावा, असे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पतसंस्था स्थापन होत आहेत. पण इतरत्र मात्र नव्याने पतसंस्था सुरू करण्याला बंदी आहे. खरे तर तो मुलभूत अधिकार असतानाही नवी संस्था स्थापन करायला दिली जात नाही. हे या अधिवेशनातून ठळकपणे मांडण्यात येणार आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. डिजिटल व्यवहार, वसुलीचे अधिकार याबाबतही काही मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहेत. ते सोडवण्यासाठी पाठपुरावाही केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोनापासून पतसंस्थांमध्ये मोठे बदलबँकेत ठेवी आहेत, खात्यात पैसे आहेत, पण तेथे गेल्याशिवाय व्यवहार करता येत नाही, अशी स्थिती कोरोना काळात होती. त्यावेळी पतसंस्थांनी आपल्या सभासदांसाठी पैसे घरपोच करण्यासह अनेक बदल केले. त्यामुळे पतसंस्थांच्या व्यवहारांमध्ये कोरोनानंतर वाढ झाली आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.