शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

केंद्र सरकारवरील दबावासाठी पतसंस्थांचे दिल्लीत अधिवेशन

By मनोज मुळ्ये | Updated: November 2, 2023 19:15 IST

सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांची माहिती

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात देशातील पतसंस्थांचे कामकाज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचवेळी काही समस्याही प्राधान्याने पुढे येत आहेत. त्यातील काही समस्या केंद्र सरकारच्या अखत्यारितील असल्याने सहकारी भारतीच्या माध्यमातून देशातील पतसंस्था प्रतिनिधींचे एक अधिवेशन २ व ३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणार असल्याची माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी दिली.

या अधिवेशनाबाबतची माहिती देण्यासाठी डॉ. जोशी गुरुवारी रत्नागिरी आले होते. त्यांनी जिल्ह्यातील पतसंस्था प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्यानंतर स्वामी स्वरुपानंद सहकारी पतसंस्थेत झालेल्या पतसंस्थेत त्यांनी याविषयी माहिती दिली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. या अधिवेशनाला देशातील पतसंस्थांचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित असतील. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा या अधिवेशनाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

२८ प्रदेशातील ६५० जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे काम पोहोचले आहे. सहकारातील वेगवेगळ्या क्षेत्रांची राष्ट्रीय अधिवेशने २ ऑक्टोबरपासून घेतली जात आहेत. दोन अधिवेशने झाली आहेत. आता क्रेडीट सोसायट्यांचे अधिवेशन दिल्लीमध्ये घेतले जाणार आहे. देशात १ लाख १० हजार पतसंस्था आहेत. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र अशा पतसंस्थांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी पडून आहेत. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण असावे, यासाठी एखादे महामंडळ किंवा संस्था असावी, आयकराबाबतचे काही प्रश्न अजून बाकी आहेत, २० हजार रुपयांच्यावर रोखीने व्यवहार झाल्यास त्यासाठी दंड भरावा लागतो, गुंतवणुकीवरील व्याजावर कर आकारला जातो, त्याबाबत निर्णय व्हावा, असे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात पतसंस्था स्थापन होत आहेत. पण इतरत्र मात्र नव्याने पतसंस्था सुरू करण्याला बंदी आहे. खरे तर तो मुलभूत अधिकार असतानाही नवी संस्था स्थापन करायला दिली जात नाही. हे या अधिवेशनातून ठळकपणे मांडण्यात येणार आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले. डिजिटल व्यवहार, वसुलीचे अधिकार याबाबतही काही मागण्या यावेळी मांडण्यात येणार आहेत. ते सोडवण्यासाठी पाठपुरावाही केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

कोरोनापासून पतसंस्थांमध्ये मोठे बदलबँकेत ठेवी आहेत, खात्यात पैसे आहेत, पण तेथे गेल्याशिवाय व्यवहार करता येत नाही, अशी स्थिती कोरोना काळात होती. त्यावेळी पतसंस्थांनी आपल्या सभासदांसाठी पैसे घरपोच करण्यासह अनेक बदल केले. त्यामुळे पतसंस्थांच्या व्यवहारांमध्ये कोरोनानंतर वाढ झाली आहे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.