२. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. शासनाने केलेल्या कठेार टाळेबंदीमुळे सर्वच हॉटेल्स बंद ठेवण्यात आलेले आहेत. पार्सल सुविधा असली तरी ती किती चालणार, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हॉटेल बंद असल्याने कामगारांनाही घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हॉटेल व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
३. राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच मृतांची संख्याही वाढलेली आहे. त्यामुळे जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ८ दिवस कडक लॉकडाऊन झाल्यास घरामध्ये जिन्नस भरून ठेवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू झाल्याने रस्त्यावरील गर्दी वाढली आहे.