शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास ...

राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास झाल्यास त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. त्यातून, रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांना आर्थिक स्तर उंचावण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे पर्यटकांसह पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सोयी - सुविधा निर्माण करण्याकरिता स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे चिटणीस अजित यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे नैसर्गिक विविधतेने नटलेले आहेत. तर कोकणाला सुमारे ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. कोकणाला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला असून, अनेक ऐतिहासिक गड - किल्ले, पुरातन लेणी, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे आजही अस्तित्वात आहेत. कोकणामध्ये देव - देवतांना अनन्यसाधारण महत्त्व असून, येथील पवित्र देवस्थाने आणि तीर्थक्षेत्र प्रसिध्द आहेत. कृषी पर्यटनाचा विचार केला असता, फळांचा राजा असलेला हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी हापूस आंब्यासह, काजू, फणस, नारळी-पोफळी आदींच्या मोठ्या प्रमाणावर बागा आहेत. हे सर्व निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक ठेवा पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेतो. तेथील वाढणाऱ्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी याठिकाणी चांगले रस्ते वा अन्य पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ते झाल्यास याठिकाणी जगभरातील पर्यटक येऊन येथील पर्यटन विकास आणि व्यवसायाला चालना मिळेल अन् त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

--------------------------

दृष्टीक्षेपात कोकण

- कोकणाला लाभलेले अलौकिक आणि अनोखे निसर्गसौंदर्य

- ७२० किलाेमीटरचा समुद्रकिनारा

- ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा

- मानवाची हजारो वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे

- इतिहासकालीन गड-किल्ले