शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळाची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:22 IST

राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास ...

राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांना निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे. येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह अन्य विकास झाल्यास त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल. त्यातून, रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांना आर्थिक स्तर उंचावण्याची संधी प्राप्त होईल. त्यामुळे पर्यटकांसह पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सोयी - सुविधा निर्माण करण्याकरिता स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे चिटणीस अजित यशवंतराव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तळकोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड हे जिल्हे नैसर्गिक विविधतेने नटलेले आहेत. तर कोकणाला सुमारे ७२० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनाराही लाभलेला आहे. कोकणाला ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेला असून, अनेक ऐतिहासिक गड - किल्ले, पुरातन लेणी, हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे आजही अस्तित्वात आहेत. कोकणामध्ये देव - देवतांना अनन्यसाधारण महत्त्व असून, येथील पवित्र देवस्थाने आणि तीर्थक्षेत्र प्रसिध्द आहेत. कृषी पर्यटनाचा विचार केला असता, फळांचा राजा असलेला हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. याठिकाणी हापूस आंब्यासह, काजू, फणस, नारळी-पोफळी आदींच्या मोठ्या प्रमाणावर बागा आहेत. हे सर्व निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक ठेवा पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेतो. तेथील वाढणाऱ्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी याठिकाणी चांगले रस्ते वा अन्य पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. ते झाल्यास याठिकाणी जगभरातील पर्यटक येऊन येथील पर्यटन विकास आणि व्यवसायाला चालना मिळेल अन् त्यातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन अनेक कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

--------------------------

दृष्टीक्षेपात कोकण

- कोकणाला लाभलेले अलौकिक आणि अनोखे निसर्गसौंदर्य

- ७२० किलाेमीटरचा समुद्रकिनारा

- ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा

- मानवाची हजारो वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे

- इतिहासकालीन गड-किल्ले