शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

वेड्या बहिणीची वेडी ही माया!

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

धाडसाचे कौतुक : विहिरीत पडलेल्या भावाला काढले बहिणीने बाहेर

राजापूर : भाऊ कसाही असला तरी बहिणीचे आपल्या भावावर अतोनात प्रेम असते. आपल्या भावासाठी जिवावर उदार होऊन ही बहीण त्याच्यासाठी कोसावरुन धावत येते व त्याला मदत करते. अशीच एक घटना राजापूर तालुक्यातील हरळ गावात घडली आहे. जन्मापासूनच मूकबधीर असणारा प्रशांत मधुकर वाफीलकर हा ७ वर्षांचा मुलगा घराच्या आसपास खेळता खेळता विहिरीत पडला. त्याची चाहुल लागताच त्याची नववीत शिकणारी बहीण प्रियाने आपल्या जिवाची तमा न बाळगता थेट विहिरीत उडी घेत त्याला बाहेर काढले. या तिच्या धाडसी कामगिरीची वाहवा होत आहे.राजापूर तालुक्यातील हरळ येथील ग्रामस्थ मधुकर रामचंद्र वाफीलकर यांचा छोटा व जन्मताच मूकबधीर असणारा ७ वर्षांचा मुलगा प्रशांत हा घराच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी प्रशांतची आई घरात काम करत होती तर त्याची बहीण प्रिया ही शाळेत जाण्याची तयारी करीत होती. खेळता खेळता प्रशांत घराशेजारी असणाऱ्या विहिरीत पडला. त्यावेळी शाळेत जाण्याची तयारी करत असणाऱ्या प्रियाला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे बाहेर धावत येऊन तिने विहिरीत डोकावले, तर तिला प्रशांत विहिरीत पडला असल्याचे दिसले.प्रशांत विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून प्रिया घाबरुन गेली. आता काय करावे, हे तिला कळत नव्हते. मात्र, तिने क्षणाचाही विलंब न लावता थेट विहिरीत उडी घेतली व बुडणाऱ्या प्रशांतला आपल्या कवेत घेतले. त्याला घेऊन विहिरीबाहेर येणे तिला शक्य नव्हते. अखेर तिने प्रशांतला घेऊन विहिरीचा काठ गाठला व आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने घरात काम करत असलेली तिची आई बाहेर आली. तिने या दोघांना विहिरीच्या काठावर पाहिले व ग्रामस्थांना आरडाओरडा करुन बोलावले. नंतर ग्रामस्थांनी येऊन प्रशांत व प्रियाला विहिरीतून बाहेर काढले.प्रियाने दाखवलेल्या या धाडसाची बातमी हा हा म्हणता सर्वत्र पसरली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपल्या मूकबधीर भावाला वाचवणाऱ्या प्रियाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सरपंच मंगेश पांचाळ यांनी घरी जाऊन प्रियाचे अभिनंदन केले आहे. प्रत्येकाने मदत करणे, हे व्रत म्हणून स्वीकारावे, असे प्रत्येकजण म्हणतो. मात्र, बालशौर्याच्या या सत्य घटनेमुळे संवेदना माणूसकी जपतात, हे अशा घटनांतून स्पष्ट होते. स्वातंत्र्यदिनी त्यांचे कौतुक होणार आहे. (प्रतिनिधी)स्वातंत्र्यदिनी सत्कारआता १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत तिचा ग्रामपंचायतीच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शासनाने तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी तालुकावासीयांमधून करण्यात येत आहे.