शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

वेड्या बहिणीची वेडी ही माया!

By admin | Updated: August 11, 2014 00:14 IST

धाडसाचे कौतुक : विहिरीत पडलेल्या भावाला काढले बहिणीने बाहेर

राजापूर : भाऊ कसाही असला तरी बहिणीचे आपल्या भावावर अतोनात प्रेम असते. आपल्या भावासाठी जिवावर उदार होऊन ही बहीण त्याच्यासाठी कोसावरुन धावत येते व त्याला मदत करते. अशीच एक घटना राजापूर तालुक्यातील हरळ गावात घडली आहे. जन्मापासूनच मूकबधीर असणारा प्रशांत मधुकर वाफीलकर हा ७ वर्षांचा मुलगा घराच्या आसपास खेळता खेळता विहिरीत पडला. त्याची चाहुल लागताच त्याची नववीत शिकणारी बहीण प्रियाने आपल्या जिवाची तमा न बाळगता थेट विहिरीत उडी घेत त्याला बाहेर काढले. या तिच्या धाडसी कामगिरीची वाहवा होत आहे.राजापूर तालुक्यातील हरळ येथील ग्रामस्थ मधुकर रामचंद्र वाफीलकर यांचा छोटा व जन्मताच मूकबधीर असणारा ७ वर्षांचा मुलगा प्रशांत हा घराच्या बाहेर खेळत होता. त्यावेळी प्रशांतची आई घरात काम करत होती तर त्याची बहीण प्रिया ही शाळेत जाण्याची तयारी करीत होती. खेळता खेळता प्रशांत घराशेजारी असणाऱ्या विहिरीत पडला. त्यावेळी शाळेत जाण्याची तयारी करत असणाऱ्या प्रियाला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यामुळे बाहेर धावत येऊन तिने विहिरीत डोकावले, तर तिला प्रशांत विहिरीत पडला असल्याचे दिसले.प्रशांत विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे पाहून प्रिया घाबरुन गेली. आता काय करावे, हे तिला कळत नव्हते. मात्र, तिने क्षणाचाही विलंब न लावता थेट विहिरीत उडी घेतली व बुडणाऱ्या प्रशांतला आपल्या कवेत घेतले. त्याला घेऊन विहिरीबाहेर येणे तिला शक्य नव्हते. अखेर तिने प्रशांतला घेऊन विहिरीचा काठ गाठला व आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिच्या आवाजाने घरात काम करत असलेली तिची आई बाहेर आली. तिने या दोघांना विहिरीच्या काठावर पाहिले व ग्रामस्थांना आरडाओरडा करुन बोलावले. नंतर ग्रामस्थांनी येऊन प्रशांत व प्रियाला विहिरीतून बाहेर काढले.प्रियाने दाखवलेल्या या धाडसाची बातमी हा हा म्हणता सर्वत्र पसरली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपल्या मूकबधीर भावाला वाचवणाऱ्या प्रियाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सरपंच मंगेश पांचाळ यांनी घरी जाऊन प्रियाचे अभिनंदन केले आहे. प्रत्येकाने मदत करणे, हे व्रत म्हणून स्वीकारावे, असे प्रत्येकजण म्हणतो. मात्र, बालशौर्याच्या या सत्य घटनेमुळे संवेदना माणूसकी जपतात, हे अशा घटनांतून स्पष्ट होते. स्वातंत्र्यदिनी त्यांचे कौतुक होणार आहे. (प्रतिनिधी)स्वातंत्र्यदिनी सत्कारआता १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत तिचा ग्रामपंचायतीच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शासनाने तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा, अशी मागणी तालुकावासीयांमधून करण्यात येत आहे.