शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: May 11, 2016 00:09 IST

रवींद्र वायकर : तब्बल ७६ कोटींचा निधी खर्च करूनही पिंपळवाडी धरण कोरडेच

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणांचा अभ्यास करून त्यांच्या आवश्यक दुरूस्तीची माहिती घेण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाला आराखडा सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पिंंपळवाडी धरणासाठी ७६ कोटींचा निधी खर्च होऊनही पाण्याची उपलब्धता होऊ शकलेली नाही. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.खेड तालुक्यातील खोपी गावातील पिंपळवाडी धरणाची पाहणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांच्यासह परिसरातील अन्य नागरिक उपस्थित होते.यावेळी रवींद्र वायकर म्हणाले की, जिल्ह्यात असणाऱ्या धरणांतील पाण्याचा उपयोग नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी होणे आवश्यक आहे. आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याकरिता धरणांना भेटी देऊन पर्यटन विकास आराखड्याच्या धर्तीवर आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच पिंंपळवाडी धरणाचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी शासनाकडे पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतली. या माहितीमध्ये धरणाच्या कामात कुचराई झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंभाड येथील शिवस्मारकाला पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. येथील परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसा करता येईल, याचीही त्यांनी पाहणी केली.खोपी येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, विजयराव भोसले, अनंतराव भोसले, केशवराव भोसले, खोपीच्या सरपंच प्रणाली भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)