शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

रत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:03 IST

politics, ratnagiri, muncipaltycarporation रत्नागिरी शहरातील १३ कोटी रूपयांहून अधिक कामे ही नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या किंवा अन्य नावाच्या आधारे केली असल्याचे पत्र नगर परिषदेसह जिल्हाधिकारी, मंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत यांना पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार? दिवसभर पत्राची नगर परिषद कर्मंचाऱ्यांमध्ये चर्चा

रत्नागिरी : शहरातील १३ कोटी रूपयांहून अधिक कामे ही नगरसेवकांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या किंवा अन्य नावाच्या आधारे केली असल्याचे पत्र नगर परिषदेसह जिल्हाधिकारी, मंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी खासदार नीलेश राणे, उद्योजक किरण सामंत यांना पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.रत्नागिरीमध्ये नगरसेवकच मक्तेदार बनत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्या नगरसेवकाच्या/ नगरसेविकेच्या मुलाने किती रूपयांचे कोणते काम केले आहे, या सगळ्याचा विस्तृत पाढाच वाचण्यात आला आहे. याखेरीज आपल्या प्रभागात कमिशन घेतल्याशिवाय कामेच करू न देणारा नगरसेवक कोण याबाबतही माहिती देण्यात आली आहे.शहरातील १३ कोटी १० लाख रूपये खर्चाच्या कामांचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. विरोधी पक्षाचे दोन नगरसेवक यात सहभागी असल्याचा मुद्दाही नमूद आहे. हे पत्र पाठवणाऱ्याने त्यावर शहर विकास कार्यकर्ते एवढेच नमूद केले असून, जर या अर्जाची चौकशी झाली नाही तर एक हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्याचा इशाराही दिला आहे. शहरातील चार मोठ्या बिल्डरनी बेकायदेशीर कामे केली असल्याचा मुद्दाही यात स्पष्ट करण्यात आला आहे. दिवसभर या पत्राची चर्चा नगर परिषद कर्मंचाऱ्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण