शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

CoronaVirus Lockdown : प्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बसजिल्ह्यात अन्य ठिकाणी बससेवा सुरू

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, लांजा, देवरुख या आगारातून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, २२ प्रवासी असल्याशिवाय बस न सोडण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरी आगारातून सकाळपासून एकही बस सोडण्यात आलेली नाही.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हाअंतर्गत बससेवा आणि रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमांचे बंधन घालून दिले आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बससेवा सुरु करता येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.शुक्रवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गाडीतील प्रवासी संख्या मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रवासी संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस सोडता येणार नसल्याचे रत्नागिरी आगाराने ठरविले आहे.

रत्नागिरीतून दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट २२ प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येतील असा फलकच रहाटाघर येथील बसस्थानकात लावण्यात आला आहे. त्यामुळे पुरेसी प्रवासी संख्या न झाल्याने रत्नागिरी आगारातून एकही बस सोडण्यात आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी