शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

CoronaVirus Lockdown : प्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:31 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या मर्यादेमुळे रत्नागिरीतून सुटली नाही एकही बसजिल्ह्यात अन्य ठिकाणी बससेवा सुरू

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एस्. टी.ची बस वाहतूक बंद करण्यात आली होती. शुक्रवारपासून लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आल्याने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, लांजा, देवरुख या आगारातून बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, २२ प्रवासी असल्याशिवाय बस न सोडण्याचा निर्णय घेतल्याने रत्नागिरी आगारातून सकाळपासून एकही बस सोडण्यात आलेली नाही.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शुक्रवारपासून नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हाअंतर्गत बससेवा आणि रिक्षा वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी नियमांचे बंधन घालून दिले आहे. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बससेवा सुरु करता येईल, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.शुक्रवारपासून बससेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गाडीतील प्रवासी संख्या मर्यादित ठेवण्यात आल्याने प्रवासी संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस सोडता येणार नसल्याचे रत्नागिरी आगाराने ठरविले आहे.

रत्नागिरीतून दापोली, चिपळूण, राजापूर, नाटे आणि जयगड या मार्गावर थेट २२ प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बस सोडण्यात येतील असा फलकच रहाटाघर येथील बसस्थानकात लावण्यात आला आहे. त्यामुळे पुरेसी प्रवासी संख्या न झाल्याने रत्नागिरी आगारातून एकही बस सोडण्यात आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी