शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

CoronaVirus In Ratnagiri: दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:31 IST

गेल्या दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांनी मात केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ रुग्ण झाले असून यामध्ये ८६ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांची मातकोरोनाग्रस्तांच्या तब्येतीत सुधारणा

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांत कोरोनावर ७ रुग्णांनी मात केली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९२ रुग्ण झाले असून यामध्ये ८६ रुग्णांचा समावेश आहे.दररोज जिल्ह्यात चाकरमान्यांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. जिल्ह्यात संस्थात्मक क्वारंटाईनची संख्याही जास्त झाल्याने आता होम क्वारंटाईनवर भर देण्यात येत आहे.चाकरमान्यांच्या वाढत्या संख्येसह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येतही वाढ होत असल्याने जिल्हावासियांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी जिल्ह्यातील ५ जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी व अन्य चार जणांचा समावेश आहे. आज सोमवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यामध्ये खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आणि रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालय येथील प्रत्येक एक रुग्ण आहे.जिल्ह्यात एकूण ९२ रुग्ण झाले असून, त्यापैकी १७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, उर्वरित ७२ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी