शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Coronavirus : ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यालाही कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 04:21 IST

Coronavirus: गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले.

- मनोज मुळ््येरत्नागिरी : उशिरापर्यंत सुरू असलेली अतिवृष्टी, दोन मोठी वादळे यामुळे आधीच तोट्यात गेलेल्या हापूस आंब्याच्या उरल्या सुरल्या उत्पादनाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आंबा निर्यातीला पूर्ण मर्यादा आल्या असून, कोकणच्या राजावर आता अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले. त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला अधिक बसला. या बदलामुळे थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत आंब्याला मोहोरच आला नाही. जानेवारी महिन्यात थंडी सुरू झाल्यानंतर मोहोर आला. मात्र या विलंबामुळे सरासरी उत्पादनाच्या ४0 टक्के इतकाच मोहोर आला. हा आंबा उशिराने हाती येणार हे निश्चित आहे. मे महिन्यात हापूससोबतच कर्नाटक, गुजरातचा आंबा बाजारात येतो. त्यामुळे उशिराने आलेले आंबा पीक बागायतदारांना फायदेशीर ठरत नाही.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १ लाख टनापेक्षा अधिक आंबा उत्पादित होतो. त्यातून दरवर्षी ४00 ते ५00 कोटी रूपयांची उलाढाल होते. मात्र यंदा मुळातच या सरासरी उत्पादनात ६0 टक्क्यांची घट झाली आहे. जे काही उत्पादन हाती येणार आहे, ते परदेशी पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. आॅनलाईन सुविधेमार्फत, पणन मंडळाकडून त्याबाबत मोठ्या हालचाली झाल्या होत्या. मात्र आता या साऱ्या प्रयत्नांवर कोरोनामुळे पाणी फेरले आहे. कोरोनामुळे बहुतांश देशांची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे निर्यातीचा मोठा प्रश्न आहे. एप्रिलच्या मध्यापासून आंबा पीक हाती येण्यास सुरूवात होईल. मे महिन्यात त्याची आवक अधिक असेल. अशावेळी इतर राज्यातील आंब्याशी स्पर्धा करून कोकणाच्या राजाला बाजारात टिकाव धरणे अवघड होणार आहे. तोपर्यंत विमानसेवा सुरळीत झाली तरी इतर देशांमधून हापूसला मागणी येईल का, हा प्रश्न असेल.आखाती देशात समुद्रमार्गे त्यातल्या त्यात थोडा दिलासा आखाती देशांमधील हापूस निर्यातीला मिळाला आहे. विमानसेवा बंद असल्याने१0 हजार पेट्या आंबा समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये पाठवण्यात आला आहे. ही सुविधा विमानसेवेपेक्षा खूपच स्वस्त असलीतरी त्यात जाणारा वेळ लक्षात घेता ती कायमस्वरूपी उपयोगी पडणारी नाही. यंदा निर्यात पूर्ण बंद होण्यापेक्षा एवढा तरी दिलासा मिळाला आहे.निर्यातीची नवी दारे उघडून बंदआॅनलाईन पद्धतीने युरोपीय देशांसोबतच यंदा दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना या दोन देशांकडून नव्याने हापूसला मागणी आली होती. त्यामुळे यंदा निर्यातीची नवी दारे उघडणार, हे बागायतादारांसाठी सुखावह होते. मात्र आता विमानसेवाच अडचणीत आल्यामुळे या देशांमध्ये होऊ शकणारी आंबा निर्यात धोक्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस