शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Coronavirus : ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यालाही कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 04:21 IST

Coronavirus: गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले.

- मनोज मुळ््येरत्नागिरी : उशिरापर्यंत सुरू असलेली अतिवृष्टी, दोन मोठी वादळे यामुळे आधीच तोट्यात गेलेल्या हापूस आंब्याच्या उरल्या सुरल्या उत्पादनाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आंबा निर्यातीला पूर्ण मर्यादा आल्या असून, कोकणच्या राजावर आता अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले. त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला अधिक बसला. या बदलामुळे थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत आंब्याला मोहोरच आला नाही. जानेवारी महिन्यात थंडी सुरू झाल्यानंतर मोहोर आला. मात्र या विलंबामुळे सरासरी उत्पादनाच्या ४0 टक्के इतकाच मोहोर आला. हा आंबा उशिराने हाती येणार हे निश्चित आहे. मे महिन्यात हापूससोबतच कर्नाटक, गुजरातचा आंबा बाजारात येतो. त्यामुळे उशिराने आलेले आंबा पीक बागायतदारांना फायदेशीर ठरत नाही.एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १ लाख टनापेक्षा अधिक आंबा उत्पादित होतो. त्यातून दरवर्षी ४00 ते ५00 कोटी रूपयांची उलाढाल होते. मात्र यंदा मुळातच या सरासरी उत्पादनात ६0 टक्क्यांची घट झाली आहे. जे काही उत्पादन हाती येणार आहे, ते परदेशी पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. आॅनलाईन सुविधेमार्फत, पणन मंडळाकडून त्याबाबत मोठ्या हालचाली झाल्या होत्या. मात्र आता या साऱ्या प्रयत्नांवर कोरोनामुळे पाणी फेरले आहे. कोरोनामुळे बहुतांश देशांची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे निर्यातीचा मोठा प्रश्न आहे. एप्रिलच्या मध्यापासून आंबा पीक हाती येण्यास सुरूवात होईल. मे महिन्यात त्याची आवक अधिक असेल. अशावेळी इतर राज्यातील आंब्याशी स्पर्धा करून कोकणाच्या राजाला बाजारात टिकाव धरणे अवघड होणार आहे. तोपर्यंत विमानसेवा सुरळीत झाली तरी इतर देशांमधून हापूसला मागणी येईल का, हा प्रश्न असेल.आखाती देशात समुद्रमार्गे त्यातल्या त्यात थोडा दिलासा आखाती देशांमधील हापूस निर्यातीला मिळाला आहे. विमानसेवा बंद असल्याने१0 हजार पेट्या आंबा समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये पाठवण्यात आला आहे. ही सुविधा विमानसेवेपेक्षा खूपच स्वस्त असलीतरी त्यात जाणारा वेळ लक्षात घेता ती कायमस्वरूपी उपयोगी पडणारी नाही. यंदा निर्यात पूर्ण बंद होण्यापेक्षा एवढा तरी दिलासा मिळाला आहे.निर्यातीची नवी दारे उघडून बंदआॅनलाईन पद्धतीने युरोपीय देशांसोबतच यंदा दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना या दोन देशांकडून नव्याने हापूसला मागणी आली होती. त्यामुळे यंदा निर्यातीची नवी दारे उघडणार, हे बागायतादारांसाठी सुखावह होते. मात्र आता विमानसेवाच अडचणीत आल्यामुळे या देशांमध्ये होऊ शकणारी आंबा निर्यात धोक्यात आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस