शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही कोरोनाचे अनिष्ट सावट पर्यटनावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या तसेच हिरवाई यांचे आकर्षण पर्यटकांना अधिक असते. त्यामुळे त्याच्या आकर्षणाने सुट्यांच्या कालावधीत पर्यटक कोकणात येत ...

कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या तसेच हिरवाई यांचे आकर्षण पर्यटकांना अधिक असते. त्यामुळे त्याच्या आकर्षणाने सुट्यांच्या कालावधीत पर्यटक कोकणात येत असतात. अगदी एक दोन दिवसांच्या कालावधीतही ताण घालवायला येणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे. त्यामुळे परीक्षा मार्च - एप्रिलच्यादरम्यान संपल्या की, मग पर्यटकांना वेध लागतात ते कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचे आणि इथल्या निसर्गसौंदर्याचे. काही वेळा तर पावसाळी पर्यटनासाठीही येणारे पर्यटक आता वाढू लागले आहेत. पावसाळ्यात कोकणचे हिरवेगार सौंदर्य पर्यटकांना अधिक भावते. म्हणूनच जून - जुलैनंतर पाऊस कमी झाला की, ऑगस्ट महिन्यात कोकणातील अवखळ धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात.

कोकणच्या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. इतर विशेषत: समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने एक दोन दिवसांच्या सुटीसाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. मात्र, २०२० साल सुरू झाले ते कोरोनासाेबतच. त्यामुळे गेल्यावर्षी ऐन उन्हाळी पर्यटनाचा हंगाम असूनही पर्यटकांना घरी बसावे लागले. लाॅकडाऊनचा कालावधी वाढला. त्यामुळे अगदी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पर्यटक घरातच होते. डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने तब्बल दहा महिने घरातच अडकून पडलेले पर्यटक जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडले.

जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांत पर्यटनाचा आनंद मिळाला. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आता लवकरच कोरोना नष्ट होणार, असे वाटत होते. त्यामुळे कोरोना संपल्यानंतर उन्हाळी हंगामात अनेकांनी पर्यटनाचे नियोजनही केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या भरमसाठ वाढत असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संसर्ग थोपविण्याच्या दृष्टीने शासनाने ‘ब्रेक दि चेन’ मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाले आहे.

सध्या कोरोनास्थिती चिंताजनक असल्याने ती बदलण्यास अजून काही कालावधी जाणार आहे. सध्या शासनाने ९ वीपर्यंत तसेच अकरावीचीही परीक्षा रद्द केली आहे. दहावी - बारावीच्याही परीक्षा लांबणीवर गेल्या असल्या तरीही त्या या महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन अथवा ऑफलाईन परीक्षा झाल्या तरीही सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने शासनास नाईलाजाने मिनी लाॅकडाऊन सुरू करावा लागला आहे. वीकएंडला पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्याने या कालावधीत पर्यटकांना सुटीचा आनंद घेण्यासाठी येणे अवघड होणार आहे. त्यामुळे कोरोनास्थिती पाहता, यावर्षीही कोरोनाचे सावट पर्यटनावर राहणार असल्याचे वाटू लागले आहे.