शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही कोरोनाचे अनिष्ट सावट पर्यटनावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:30 IST

कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या तसेच हिरवाई यांचे आकर्षण पर्यटकांना अधिक असते. त्यामुळे त्याच्या आकर्षणाने सुट्यांच्या कालावधीत पर्यटक कोकणात येत ...

कोकणातील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या तसेच हिरवाई यांचे आकर्षण पर्यटकांना अधिक असते. त्यामुळे त्याच्या आकर्षणाने सुट्यांच्या कालावधीत पर्यटक कोकणात येत असतात. अगदी एक दोन दिवसांच्या कालावधीतही ताण घालवायला येणाऱ्यांची संख्याही आता वाढली आहे. त्यामुळे परीक्षा मार्च - एप्रिलच्यादरम्यान संपल्या की, मग पर्यटकांना वेध लागतात ते कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचे आणि इथल्या निसर्गसौंदर्याचे. काही वेळा तर पावसाळी पर्यटनासाठीही येणारे पर्यटक आता वाढू लागले आहेत. पावसाळ्यात कोकणचे हिरवेगार सौंदर्य पर्यटकांना अधिक भावते. म्हणूनच जून - जुलैनंतर पाऊस कमी झाला की, ऑगस्ट महिन्यात कोकणातील अवखळ धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात.

कोकणच्या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण आहे. इतर विशेषत: समुद्रकिनाऱ्यांच्या ओढीने एक दोन दिवसांच्या सुटीसाठी विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. मात्र, २०२० साल सुरू झाले ते कोरोनासाेबतच. त्यामुळे गेल्यावर्षी ऐन उन्हाळी पर्यटनाचा हंगाम असूनही पर्यटकांना घरी बसावे लागले. लाॅकडाऊनचा कालावधी वाढला. त्यामुळे अगदी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत पर्यटक घरातच होते. डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने तब्बल दहा महिने घरातच अडकून पडलेले पर्यटक जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडले.

जानेवारी - फेब्रुवारी या दोन महिन्यांत पर्यटनाचा आनंद मिळाला. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने आता लवकरच कोरोना नष्ट होणार, असे वाटत होते. त्यामुळे कोरोना संपल्यानंतर उन्हाळी हंगामात अनेकांनी पर्यटनाचे नियोजनही केले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मार्च महिन्यापासून रुग्णसंख्या भरमसाठ वाढत असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संसर्ग थोपविण्याच्या दृष्टीने शासनाने ‘ब्रेक दि चेन’ मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन सुरू झाले आहे.

सध्या कोरोनास्थिती चिंताजनक असल्याने ती बदलण्यास अजून काही कालावधी जाणार आहे. सध्या शासनाने ९ वीपर्यंत तसेच अकरावीचीही परीक्षा रद्द केली आहे. दहावी - बारावीच्याही परीक्षा लांबणीवर गेल्या असल्या तरीही त्या या महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यामुळे मुलांच्या ऑनलाईन अथवा ऑफलाईन परीक्षा झाल्या तरीही सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने शासनास नाईलाजाने मिनी लाॅकडाऊन सुरू करावा लागला आहे. वीकएंडला पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर झाल्याने या कालावधीत पर्यटकांना सुटीचा आनंद घेण्यासाठी येणे अवघड होणार आहे. त्यामुळे कोरोनास्थिती पाहता, यावर्षीही कोरोनाचे सावट पर्यटनावर राहणार असल्याचे वाटू लागले आहे.