शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

corona virus-जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 17:01 IST

corona virus Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीतसर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात

शोभना कांबळेरत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ५ असलेली संख्या मे महिन्यात २८१ वर पोहोचली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. गणेशोत्सवाच्या कालावधीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईकर गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात परतले. त्यामुळे केवळ ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या १७७३ झाली, तर कोरोनाने ७४ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला. या महिन्यातच केवळ रुग्ण संख्या ३९४५ झाली तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० वर पोहोचली.२६ सप्टेंबरअखेर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्याबरोबर मृत्यूचेही प्रमाण घटले. जानेवारपासून पुन्हा रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.पुरूषांचे मृत्यू जास्तजिल्ह्यात ९ फेब्रुवारी अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३५२ झाली आहे. यात पुरूषांची संख्या २६१, तर महिलांची संख्या ९१ आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३० बळी गेले. त्याचबरोबर या महिन्यात रूग्णसंख्याही भरमसाठ वाढली. मात्र, २६ सप्टेंबरपासून रूग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. ऑक्टोबर महिन्यातील रूग्णसंख्या ८४६ वर आली, तर मृत्यू संख्या ५२ होती. मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे दोन महिने कोरोना रूग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत दिलासा देणारे ठरले.० ते १५ वयोगटाची कोरोनावर यशस्वी मातआतापर्यंत ० ते १५ वयोगटातील रूग्णांनी मृत्यूवर यशस्वी मात केली आहे. तसेच सुमारे ४२ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाने निधन झालेले बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचे योगदान महत्वपूर्ण होते. जानेवारी महिन्यात मात्र, १६ वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ० ते २० वयोगटात एका मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ६१ ते ८० वयोगटातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक १७९ आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी