शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका, औषधे न मिळाल्याने बळावला आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:18 IST

mental hospital Ratnagiri-रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मनोरुग्णांना कोरोनाचा फटका रूग्णांची औषधे न मिळाल्याने बळावला आजार

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून मनोरुग्ण उपचारासाठी येत असतात. कोरोनाच्या अनुषंगाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने वाहतूक थांबली.

जे मनोरुग्ण रुग्णालयात भरती केलेले होते, त्यांची औषधे नियमित सुरू राहिली. मात्र, या पाच जिल्ह्यांत बरे होऊन परतलेल्या रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यात ही औषधे उपलब्ध नसल्याने नियमित औषधांसाठी रत्नागिरीला येणे क्रमप्राप्त होते. मात्र, कोरोना काळात या रुग्णांना रत्नागिरीत आणणे त्यांच्या नातेवाईकांना शक्य झाले नाही; त्यामुळे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या आजारात पुन्हा वाढ झाली.

 

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मनोरुग्ण रत्नागिरीत उपचारासाठी येतात. बरे होऊन जाणाऱ्यांनाही नियमित औषधे घ्यावी लागतात. ती औषधे येथील मनोरुग्णालयात मिळतात. मात्र, कोरोनाच्या काळात सर्वच बंद असल्याने या रुग्णांना औषधे वेळेवर मिळाली नाहीत; त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.- डॉ. संजय कलकुटगी,प्रशासकीय अधिकारी

या आजारांच्या रूग्णांमध्ये झाली वाढया पाच जिल्ह्यांमध्ये उपचार सुरू असलेले सुमारे २,१८६ मनोरुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण बरे झालेले असले तरी त्यांची औषधे नियमित द्यावी लागतात. ही औषधे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून न्यावी लागतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांना ही औषधे मिळू शकली नाहीत. त्यामुळे काल्पनिक भयंगड (एन्झायटी), नैराश्य (डिप्रेशन), सिझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) हे रुग्ण वाढले.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयRatnagiriरत्नागिरी