शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका, औषधे न मिळाल्याने बळावला आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:18 IST

mental hospital Ratnagiri-रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्दे मनोरुग्णांना कोरोनाचा फटका रूग्णांची औषधे न मिळाल्याने बळावला आजार

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून मनोरुग्ण उपचारासाठी येत असतात. कोरोनाच्या अनुषंगाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने वाहतूक थांबली.

जे मनोरुग्ण रुग्णालयात भरती केलेले होते, त्यांची औषधे नियमित सुरू राहिली. मात्र, या पाच जिल्ह्यांत बरे होऊन परतलेल्या रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यात ही औषधे उपलब्ध नसल्याने नियमित औषधांसाठी रत्नागिरीला येणे क्रमप्राप्त होते. मात्र, कोरोना काळात या रुग्णांना रत्नागिरीत आणणे त्यांच्या नातेवाईकांना शक्य झाले नाही; त्यामुळे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या आजारात पुन्हा वाढ झाली.

 

येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मनोरुग्ण रत्नागिरीत उपचारासाठी येतात. बरे होऊन जाणाऱ्यांनाही नियमित औषधे घ्यावी लागतात. ती औषधे येथील मनोरुग्णालयात मिळतात. मात्र, कोरोनाच्या काळात सर्वच बंद असल्याने या रुग्णांना औषधे वेळेवर मिळाली नाहीत; त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.- डॉ. संजय कलकुटगी,प्रशासकीय अधिकारी

या आजारांच्या रूग्णांमध्ये झाली वाढया पाच जिल्ह्यांमध्ये उपचार सुरू असलेले सुमारे २,१८६ मनोरुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण बरे झालेले असले तरी त्यांची औषधे नियमित द्यावी लागतात. ही औषधे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून न्यावी लागतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांना ही औषधे मिळू शकली नाहीत. त्यामुळे काल्पनिक भयंगड (एन्झायटी), नैराश्य (डिप्रेशन), सिझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) हे रुग्ण वाढले.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयRatnagiriरत्नागिरी