शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - मुंबईकरांच्या मदतीला धावले एसटीचे कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:39 IST

मुंबईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हात पुढे केला आहे. एस्. टी. अनेक संकटातून जात आहे. लालपरीतून या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी व तेथून पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील विविध विभागातील ८६ चालक - वाहक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी विभागातील सहाजणांचा समावेश आहे. लवकरच आणखी काहीजण मुंबईकडे कूच करणार आहेत.

ठळक मुद्देरत्नागिरी विभागातील सहाजण मुंबईला रवाना लवकरच आणखी नवी टीम मुंबईकडे करणार कूच

रत्नागिरी : मुंबईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हात पुढे केला आहे. एस्. टी. अनेक संकटातून जात आहे. लालपरीतून या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी व तेथून पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील विविध विभागातील ८६ चालक - वाहक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी विभागातील सहाजणांचा समावेश आहे. लवकरच आणखी काहीजण मुंबईकडे कूच करणार आहेत.कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंघावत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तरीदेखील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या तिन्ही विभागातील कर्मचारी गावाला निघून गेल्यामुळे एस्. टी. महामंडळाने चालक आणि वाहकांची कमतरता भासू नये, यासाठी सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागाचे एस्. टी.चे चालक आणि वाहकांना बोलावले आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतानाच लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. रायगड विभागातील २०, सातारा विभाग १६, रत्नागिरी ६, सोलापूर विभाग २३ आणि नाशिक विभाग २१, असे एकूण ८७ एस्. टी.चे वाहक आणि चालक मुंबईकडे रवाना झाले आहेत. लवकरच रत्नागिरी विभागातील आणखी १५ जणांची टीम मुंबईकडे रवाना होणार आहे. शासकीय आदेशाचे पालन करीत आवश्यक ते पास घेऊनच मंडळी सेवा बजावण्यासाठी मुंबईकडे कूच करणार आहेत.कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत रत्नागिरी विभागातील सहाजण मुंबईत पोहोचले आहेत. त्यामध्ये राजापूर आगारातील चालक तथा वाहक दत्तात्रय दादाराव पांचारे, चालक तथा वाहक सिध्दार्थ अरूण लांडगे आणि चालक सचिन रामराव वळगे, दापोली आगारातील चालक यु. पी. टापरे, ए. एच्. पाटील आणि गुहागर आगारातील चालक तथा वाहक प्रवीण संतोष जाधव यांचा समावेश आहे.या चालक - वाहकांकडे मुंबईत वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वाशी, मुंबई महापालिका हद्दीतील शहरी वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चालक - वाहक शेकडो किलोमीटर अंतरावरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. एस्. टी.ने संकटसमयी धावून जाण्याचे मनोधैर्य दाखविल्याने चालक- वाहक तसेच त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या एस्. टी.च्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.विशेष वाहतूककोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा कार्यरत आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांची वाहतूक सुविधा एस्. टी. महामंडळाकडे दिली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातर्फे शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी