शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

corona virus : लोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 16:24 IST

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.

ठळक मुद्देलोकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी दरदिवशी होणाऱ्या स्वॅब आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर मृत्यूचा दरही वाढतो आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. मात्र, नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढला आहे.४ मे रोजी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काहीअंशी शिथिलता आल्याने मुंबईकर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात दाखल झाले आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दोन आकडी असलेली संख्या मे अखेर तीन आकडी होत चौपट झाली. त्यानंतर मेअखेरीस २५० असलेली संख्या जूनअखेर ६०० झाली. त्यानंतरही संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. गेल्या साडेतीन महिन्यात ही संख्या दहापट म्हणजेच ६,८०० पेक्षा अधिक वाढली आहे. मृतांचा आकडाही आता २२५ वर जाऊन पोहोचला आहे.आॅगस्ट महिन्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरीतील रुग्णसंख्या वाढणार, हा अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. आॅगस्ट महिन्यात प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाचा विस्फोट झाला. त्यानंतर ही संख्या अधिकच वाढू लागली आहे. सध्या कोरोनाचा समूह संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वारंवार कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करण्यासाठी सातत्याने आवाहन करीत आहेत. मात्र, नागरिक बेजबाबदारपणे हे नियम टाळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्गाचे प्रमाणही वाढू लागले आहे. दिवसाला पॉझिटिव्ह येणाऱ्या अहवालाची संख्या वाढली आहे.कोरोना योद्धेही मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आधीच अपुऱ्या असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन शारीरिक अंतर ठेवणे, त्याचबरोबर मास्क वापरणे, सॅनिटाइझ करणे किंवा साबणाने होत धुण्याची सवय नियमित करायला हवी.

जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग वाढू लागला असला तरी नागरिक शारीरिक अंतराची तमा न बाळगता विनामास्क बाहेर भटकत आहेत. त्यामुळे समूह संसर्गाचे प्रमाण रोखणे आता आरोग्य यंत्रणेसमोर खरोखरच मोठे आव्हान ठरत आहे.खरेदीला गर्दीआता सर्वत्र अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. सर्वच बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या स्वैर वागण्यात अधिकच भर पडली आहे. दुकाने सुरू झाल्याने लोक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. यातूनच व्यापारी आणि नागरिक बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही नागरिक कोरोना कायमचा गायब झाला, अशी बेफिकीरी दाखवत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करीत आहेत.मृत्यूदर वाढतोयजिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २२ सप्टेंबरअखेर ५०८० (७४.३५ टक्के) आहे. रुग्ण संख्येत एकूण लोकसंख्येच्या ०.३ टक्के वाढ झाली आहे, तर मृत्यू दर २.९ टक्क्यांवरून पुन्हा ३.२९ टक्के एवढा वाढला आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी आता ६७ टक्क्यांवरून ७४ टक्क्यांपर्यंत पोहोचली असली तरी मृत्यूची वाढती टक्केवारीही चिंताजनक आहे.

लोकांमध्ये कोरोनाबाबतची जागरूकता नाही. त्यामुळे अजूनही शारीरिक अंतर राखणे, मास्क लावणे, यांचे पालन केले जात नाही. त्यामुळेच समूह संसर्ग वाढू लागला आहे. त्याचबरोबर गंभीर आजार किंवा गंभीर शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांनीही भीती न बाळगता खबरदारी घ्यायला हवी. पण आपल्याकडे अंगावर आजार काढणे, ही मानसिकता असल्याने चाचणी वेळेवर होत नाही. लोक दुसरा कुठला आजार वाढला, तरच तपासणी करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना केवळ हृदय आणि फुफ्फुसावर परिणाम करत नाही तर इतर गंभीर आजारावरही करतो, हे न लक्षात घेतल्याने आजार वाढतो आणि मृत्यूदरही वाढ जातो.- डॉ. अलिमियॉ परकार,रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी