शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोरोना लसीकरण मोहीम जनगणनेप्रमाणे राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

चिपळूण : सजाप्रमाणे जनगणना योजना राबविली जाते, त्याप्रमाणे नियोजन करून ही कोरोना लसीकरण मोहीम राबवावी; तरच १०० टक्के लसीकरण ...

चिपळूण : सजाप्रमाणे जनगणना योजना राबविली जाते, त्याप्रमाणे नियोजन करून ही कोरोना लसीकरण मोहीम राबवावी; तरच १०० टक्के लसीकरण यशस्वी होईल. तसेच कोरोना लसीकरण मोहीम केंद्र सरकारने सर्वस्वी राज्य शासनाकडे सोपवावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे व प्रधान सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष सीताराम शंकर शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

लसीकरण मोहिमेत अनेक त्रुटी आहेत. म्हणून शासनाने तालुका, नगर परिषद, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात असणारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, नगर परिषद दवाखाना, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे या शासनाच्या दवाखान्याअंतर्गत येणारी गावे, शहरे, वाड्या - वस्त्यामधील वयोगटानुसार त्या - त्या कार्यक्षेत्रातील जनतेचे कोरोना लसीकरण डॉक्टर्स, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्या - त्या भागातील खासगी डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेज, ज्यांना ज्यांना वैद्यकीय सेवा देता येते त्या सर्वांचा सहभाग घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे़

मोबाइल ॲपवरील नोंदणीने लसीकरण पूर्ण होणार नाही. कारण गोरगरीब जनता, कष्टकरी, आदिवासी, दलित, मोलमजुरी करणारे, घरकाम करणारे, डोंगरदऱ्या - वाडीवस्तीवर राहणारे आदिवासी यांच्याकडे कोठे स्मार्ट फोन आहेत? बरे असल्यास तेथे इंटरनेट कोठे आहे? व त्यांना त्याचा वापर कोठे करता येतो? या आपल्या लसीकरण मोहिमेमुळे जनतेची अत्यंत धावपळ होत आहे. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना दिवस दिवसभर थांबून राहावे लागते. लस न मिळाल्यास निराश होऊन परत जावे लागते. यामुळे जनतेचा रोष होऊ लागला आहे. लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळत असल्यामुळे कोरोना प्रसारही वाढत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.