शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

corona in ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा दीडशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:00 IST

जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़

ठळक मुद्देजिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५१, कोरोनाबाधित सर्व मुंबईकर रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, खेडमध्ये आढळले रुग्ण

रत्नागिरी : जिल्हावासियांना शनिवारी दिवसभर दिलासा मिळाला असतानाच शनिवारी रात्री १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारी सायंकाळी आणखीन ६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१ वर जाऊन पोहोचली आहे़.

शनिवारी रात्री आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ४, चिपळूणमधील ३ तर संगमेश्वर, लांजा, राजापूरमधील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर रविवारी खेड तालुक्यातील ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी - चिंचवाडा येथील १६ वर्षीय युवकाचा समावेश असून, तो २३ मे रोजी मुंबईतील वडाळा येथून रत्नागिरीत दाखल झाला होता. भोके - मठवाडी येथे आलेल्या ६० वर्षीय वृद्धाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. याच गावातील ४३ वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर करबुडे रामगडेवाडी येथील ५५ वर्षीय प्रौढाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण १९ मे रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथून गावी आले होते.चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते - पावसकर वाडी येथील ३९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ही महिला घाटकोपर येथून रत्नागिरीत दि. १६ मे रोजी आली होती. तसेच वाघिरे मोहल्ला येथे मुंब्रा येथून आलेल्या १८ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कळंबट - बौद्धवाडी येथील ३७ वर्षाच्या प्रौढाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते कांदिवली भागातून आले असून, १८ मेपासून कामथे येथील रुग्णालयात दाखल आहेत.संगमेश्वर तालुक्यातील फेपडेवाडी, मानसकोंड येथील ३० वर्षाच्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण विरार येथून दि. १६ मे रोजी दाखल झाला होता. त्यालाही साडवली येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच निवे येथील १८ वर्षाच्या युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.लांजा तालुक्यातील वाघ्रट येथे १८ मे रोजी मुंबईहून आलेल्या १२ वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर वाघ्रट - पाटणेवाडीतील २८ वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक मुंबई - नालासोपारा येथून १८ मे रोजी आला होता.राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील पती-पत्नींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघे १८ मे रोजी मुंबईतील कांदिवली येथून गावी आले होते. त्या दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून मिरज येथे पाठविण्यात आलेल्या ७ नमुन्यांचा अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी एक अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरीत ६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालांमध्ये तळे (ता. खेड) येथील एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. ते मुंबईतून आलेले असून, ताप आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. अन्य दोघांमध्ये एकजण ठाणे येथून वरवली - आंबवली आहे तर दुसरा मुलुंड येथून दयाळ येथे गावी आलेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी